शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चौघांवर दोन नागरी आरोग्य केंद्रांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:29 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी भागातील गरजू नागरिकांना वेळीच चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी या हेतूने शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आल;पण दोन्ही आरोग्य केंद्रात अपुरा मनुष्यबळ असल्याने व एकही वैद्यकीय अधिकारीच नसल्याने ......

ठळक मुद्दे१७ पैकी १३ पदे रिक्त : इमारती ठरताहेत शोभेच्या वास्तू, रुग्णांनाही नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी भागातील गरजू नागरिकांना वेळीच चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी या हेतूने शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आल;पण दोन्ही आरोग्य केंद्रात अपुरा मनुष्यबळ असल्याने व एकही वैद्यकीय अधिकारीच नसल्याने आरोग्य केंद्र बहूदा बंद राहते. त्यामुळे सदर आरोग्य केंद्राच्या इमारती सध्या रुग्णांसाठी शोभेची वास्तू ठरत आहे. उल्लेखनिय म्हणजे दोन्ही आरोग्य केंद्रात सध्या केवळ चार कर्मचारी कार्यरत आहेत.शहरी भागातील नागरिकांना त्यांच्याच परिसरात आरोग्य सुविधा मिळावी यासाठी लोकसंख्येच्या आधारावर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार शहरातील सानेवाडी व पुलफैल भागातील जागेचे नियोजन करून तेथे आरोग्य केंद्रासाठी सुसज्य इमारतही तयार करण्यात आली आहे;पण दोन्ही आरोग्य केंद्रात सध्या केवळ चार कर्मचारी कार्यरत असल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर बहूदा हे दोन्ही आरोग्य केंद्र बंद राहत असल्याने नागरिकांसह रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.विशेष म्हणजे दोन्ही आरोग्य केंद्रात चक्क एकही वैद्यकीय अधिकारी रुजू झालेला नाही. इतकेच नव्हे तर ज्या काही कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती त्यापैकी काही कर्मचारी कर्तव्यावर रुजूच झाले नाहीत. दोन्ही आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, चक्क १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पदे सध्या रिक्त आहेत. रुग्णांसह नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची शहरातील सुजाण नागरिकांची मागणी आहे.मद्यपींसाठी सुरक्षित ठिकाणपुलफैल व सानेवाडी भागातील नागरी आरोग्य केंद्र बहूदा बंद राहत असल्याने व तेथे सुरक्षा रक्षक राहत नसल्याने रात्रीच्या सुमारास तेथे मद्यपींचा डेरा असतो. सानेवाडी भागातील नागरिक आरोग्य केंद्र परिसरात दारूच्या रिकाम्या शिश्या व पाण्याचे पाऊस पडून असल्याचे दिसून येते. मद्यपींचा सर्वाधिक त्रास परिसरातील महिलांना सहन करावा लागत असून दोन्ही आरोग्य केंद्र परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी आहे.शहरी आरोग्य केंद्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी कुणीच वैद्यकीय अधिकारी या केंद्रात आरोग्य सेवा देण्यासाठी तयार नसल्याचे दिसून आले. आजही कुणी वैद्यकीय अधिकारी येथे सेवा देण्यास तयार असेल तर त्याच्या अर्जावरच त्यांची नियुक्ती करण्यात येईल. शिवाय उर्वरित पदे लवकर कसे भरता येईल यासाठी संबंधीतांकडे पाठपुरावा करू.- अश्विनी वाघमळे, न.प. मुख्याधिकारी, वर्धा.