शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कारंजात पाणी समस्या तीव्र; गोपालक सोडताहेत गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:38 IST

तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देटँकरद्वारे पाणीपुरवठा नाहीच । १७ गावांमध्ये विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.संपूर्ण तालुक्यात एकही शासकीय टँकर सुरू नसून १७ गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, अधिग्रहण केलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी अपुरेच आहे. त्यामुळे पाणी पेटल्याचीच स्थिती आहे. आचारसंहितेमुळे ग्रा.पं. ला टँकर सुरू करण्यासाठी ठराव घेता येत नाही. यामुळे शासकीय अधिकारीदेखील निद्रिस्त आहेत. टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणीदेखील ते करायला तयार नाहीत. तालुक्यातील चोपण, ब्राह्मणवाडा, गारपीट, धामकुंड, सेलगाव (उमाटे) येथील कित्येक गोपालक गाव सोडून गेले असून अनेक गोपालक पाणी व चाऱ्याच्या समस्येमुळे गाव सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात एकमेव खैरी धरण कोरडे पडले असून केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.धरणाशेजारील गावांंमध्ये पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. मात्र कुणाचेही लक्ष नाही. कारंजा शहरामध्येसुद्धा सहा ते सात दिवसानंतर नळ येत आहेत. खासगी टँकरचे भाडे देणे सर्वसामान्य जनतेला झपावणारे नाही. शहरातील सार्वजनिक नळावर रात्रीच्या वेळेस अनेक पाईप पडलेले असतात. यातून कित्येक लिटर पाणी वाया जात आहे.अनेकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ते कुटुंबाला नातेवाईकांकडे सोडून एकटे राहणे पसंत करीत आहेत. चारा डेपोअभावी चारा गंभीर समस्या बनली आहे. याविषयी तहसीलदार सचिन कुमावत यांनी सांगितले की, खैरी डॅममध्ये जूनपर्यंत पुरेल एवढा १८ ते २० टक्के जलसाठा साठवून ठेवला असून शासनाने विदर्भात चारा डेपो सुरू केलेले नाहीत.टँकर सुरू करण्याबाबत निर्देश पंचायत समितीकडून आलेले नाहीत. पाणी समस्येवर मात करण्याकरिता आॅक्टोबर महिन्यापासून सुरूवात करायला पाहिजे. पाणी समस्येकडे पूर्णपणे लक्ष ठेवून आहे, असे सांगितले.

टॅग्स :Waterपाणी