शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कारंजात पाणी समस्या तीव्र; गोपालक सोडताहेत गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:38 IST

तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देटँकरद्वारे पाणीपुरवठा नाहीच । १७ गावांमध्ये विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.संपूर्ण तालुक्यात एकही शासकीय टँकर सुरू नसून १७ गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, अधिग्रहण केलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी अपुरेच आहे. त्यामुळे पाणी पेटल्याचीच स्थिती आहे. आचारसंहितेमुळे ग्रा.पं. ला टँकर सुरू करण्यासाठी ठराव घेता येत नाही. यामुळे शासकीय अधिकारीदेखील निद्रिस्त आहेत. टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणीदेखील ते करायला तयार नाहीत. तालुक्यातील चोपण, ब्राह्मणवाडा, गारपीट, धामकुंड, सेलगाव (उमाटे) येथील कित्येक गोपालक गाव सोडून गेले असून अनेक गोपालक पाणी व चाऱ्याच्या समस्येमुळे गाव सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात एकमेव खैरी धरण कोरडे पडले असून केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.धरणाशेजारील गावांंमध्ये पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. मात्र कुणाचेही लक्ष नाही. कारंजा शहरामध्येसुद्धा सहा ते सात दिवसानंतर नळ येत आहेत. खासगी टँकरचे भाडे देणे सर्वसामान्य जनतेला झपावणारे नाही. शहरातील सार्वजनिक नळावर रात्रीच्या वेळेस अनेक पाईप पडलेले असतात. यातून कित्येक लिटर पाणी वाया जात आहे.अनेकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ते कुटुंबाला नातेवाईकांकडे सोडून एकटे राहणे पसंत करीत आहेत. चारा डेपोअभावी चारा गंभीर समस्या बनली आहे. याविषयी तहसीलदार सचिन कुमावत यांनी सांगितले की, खैरी डॅममध्ये जूनपर्यंत पुरेल एवढा १८ ते २० टक्के जलसाठा साठवून ठेवला असून शासनाने विदर्भात चारा डेपो सुरू केलेले नाहीत.टँकर सुरू करण्याबाबत निर्देश पंचायत समितीकडून आलेले नाहीत. पाणी समस्येवर मात करण्याकरिता आॅक्टोबर महिन्यापासून सुरूवात करायला पाहिजे. पाणी समस्येकडे पूर्णपणे लक्ष ठेवून आहे, असे सांगितले.

टॅग्स :Waterपाणी