शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कारंजात पाणी समस्या तीव्र; गोपालक सोडताहेत गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:38 IST

तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देटँकरद्वारे पाणीपुरवठा नाहीच । १७ गावांमध्ये विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात पाणी व चारा समस्या तीव्र झाली आहे. मात्र शासनस्तरावर केल्या जात असलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याने गोपालक गाव सोडून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.संपूर्ण तालुक्यात एकही शासकीय टँकर सुरू नसून १७ गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, अधिग्रहण केलेल्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणी अपुरेच आहे. त्यामुळे पाणी पेटल्याचीच स्थिती आहे. आचारसंहितेमुळे ग्रा.पं. ला टँकर सुरू करण्यासाठी ठराव घेता येत नाही. यामुळे शासकीय अधिकारीदेखील निद्रिस्त आहेत. टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणीदेखील ते करायला तयार नाहीत. तालुक्यातील चोपण, ब्राह्मणवाडा, गारपीट, धामकुंड, सेलगाव (उमाटे) येथील कित्येक गोपालक गाव सोडून गेले असून अनेक गोपालक पाणी व चाऱ्याच्या समस्येमुळे गाव सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात एकमेव खैरी धरण कोरडे पडले असून केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.धरणाशेजारील गावांंमध्ये पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. मात्र कुणाचेही लक्ष नाही. कारंजा शहरामध्येसुद्धा सहा ते सात दिवसानंतर नळ येत आहेत. खासगी टँकरचे भाडे देणे सर्वसामान्य जनतेला झपावणारे नाही. शहरातील सार्वजनिक नळावर रात्रीच्या वेळेस अनेक पाईप पडलेले असतात. यातून कित्येक लिटर पाणी वाया जात आहे.अनेकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ते कुटुंबाला नातेवाईकांकडे सोडून एकटे राहणे पसंत करीत आहेत. चारा डेपोअभावी चारा गंभीर समस्या बनली आहे. याविषयी तहसीलदार सचिन कुमावत यांनी सांगितले की, खैरी डॅममध्ये जूनपर्यंत पुरेल एवढा १८ ते २० टक्के जलसाठा साठवून ठेवला असून शासनाने विदर्भात चारा डेपो सुरू केलेले नाहीत.टँकर सुरू करण्याबाबत निर्देश पंचायत समितीकडून आलेले नाहीत. पाणी समस्येवर मात करण्याकरिता आॅक्टोबर महिन्यापासून सुरूवात करायला पाहिजे. पाणी समस्येकडे पूर्णपणे लक्ष ठेवून आहे, असे सांगितले.

टॅग्स :Waterपाणी