शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मूल्य निर्धारणासाठी फॉर्म्युला तयार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:33 IST

देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे.

ठळक मुद्देमहादेव विद्रोही : सेवाग्राम येथे राष्टÑीय परिसंवादाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे. शेतमालाचे मुल्य निर्धारित करण्याचा एक फार्म्युला तयार करण्यात यावा, असे प्रतिपादन सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी केले.भारतीय कृषी आवाहन आणि समाधान या विषयावरील सेवाग्राम येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागलू करणे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे, राष्ट्रीय स्तरावर शेतकºयांचे संगठन व विचार पीठ सक्षमपणे निर्माण करणे या मुद्यावर एकमत झाले. यात्री निवासाच्या सभागृहामध्ये २३ व २४ सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावर परिसंवाद सर्व सेवा संघ, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व सद्भावना संघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. समारोपीय कार्यक्रमाला अतिथी म्हणून आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विचार व्यक्त करताना स्वराजाचे आंदोलन उभे करायचे असेल तर शेतकºयांच्या सहभागाशिवाय शक्य नाही, असे गांधीजींचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी असहयोग आंदोलन देशात उभे केले. शरद जोशीच्या आंदोलनाला सर्व सेवा संघाने व सर्वोदयी परिवाराने बळ दिले. शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळालेच पाहिजे. २ आॅक्टोबर हा दिवस गांधीजींची जयंती जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळल्या जातो. पण, सरकारची भूमिका काही वेगळीच दिसत असल्याने सरकारशी पत्रव्यवहार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन अविनाश काकडे यांनी तर आभार शेख हुसैन यांनी मानले. प्रशांत गुजर यांनी यावेळी गीत सादर केले. कार्यक्रमाला डॉ. श्रीराम जाधव, डॉ. शिवचरण ठाकूर, सुदाम पवार, संजय कोल्हे, रामपाल जाट, महेंद्र धावडे, नितीन चौधरी, भीमराव भोयर, रामराव किटे, प्रमोद पाटील, विनायक ताकसांडे, शंकर बगाडे, राजेंद्र कुमज आदी उपस्थित होते.विविध मुद्यांवर एकमतआजच्या समारोपीय सत्रात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यावर अमिताभ पावडे, ग्रामीण व कृषी क्षेत्रात योग्य शिक्षणाच्या अभावामुळे आढळणारी समस्ये या विषयावर प्रा. नूतन माळवी, कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल यावर प्रभूजी श्रीनिवासन यांनी विचार व्यक्त केले. सदर राष्ट्रीय परिसंवादात शेतकºयांच्या समस्यांच्या विविध मुद्यांवर एकमत झाले. सदर द्विदिवशीय परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी बाबा खैरकार, सुरेंद्र नाईक, सचिन उगले, जीवन शेंडे, गजानन नेहारे आदींनी सहकार्य केले.