शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

मूल्य निर्धारणासाठी फॉर्म्युला तयार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:33 IST

देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे.

ठळक मुद्देमहादेव विद्रोही : सेवाग्राम येथे राष्टÑीय परिसंवादाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे. शेतमालाचे मुल्य निर्धारित करण्याचा एक फार्म्युला तयार करण्यात यावा, असे प्रतिपादन सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी केले.भारतीय कृषी आवाहन आणि समाधान या विषयावरील सेवाग्राम येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागलू करणे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे, राष्ट्रीय स्तरावर शेतकºयांचे संगठन व विचार पीठ सक्षमपणे निर्माण करणे या मुद्यावर एकमत झाले. यात्री निवासाच्या सभागृहामध्ये २३ व २४ सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावर परिसंवाद सर्व सेवा संघ, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व सद्भावना संघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. समारोपीय कार्यक्रमाला अतिथी म्हणून आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विचार व्यक्त करताना स्वराजाचे आंदोलन उभे करायचे असेल तर शेतकºयांच्या सहभागाशिवाय शक्य नाही, असे गांधीजींचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी असहयोग आंदोलन देशात उभे केले. शरद जोशीच्या आंदोलनाला सर्व सेवा संघाने व सर्वोदयी परिवाराने बळ दिले. शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळालेच पाहिजे. २ आॅक्टोबर हा दिवस गांधीजींची जयंती जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळल्या जातो. पण, सरकारची भूमिका काही वेगळीच दिसत असल्याने सरकारशी पत्रव्यवहार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन अविनाश काकडे यांनी तर आभार शेख हुसैन यांनी मानले. प्रशांत गुजर यांनी यावेळी गीत सादर केले. कार्यक्रमाला डॉ. श्रीराम जाधव, डॉ. शिवचरण ठाकूर, सुदाम पवार, संजय कोल्हे, रामपाल जाट, महेंद्र धावडे, नितीन चौधरी, भीमराव भोयर, रामराव किटे, प्रमोद पाटील, विनायक ताकसांडे, शंकर बगाडे, राजेंद्र कुमज आदी उपस्थित होते.विविध मुद्यांवर एकमतआजच्या समारोपीय सत्रात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यावर अमिताभ पावडे, ग्रामीण व कृषी क्षेत्रात योग्य शिक्षणाच्या अभावामुळे आढळणारी समस्ये या विषयावर प्रा. नूतन माळवी, कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल यावर प्रभूजी श्रीनिवासन यांनी विचार व्यक्त केले. सदर राष्ट्रीय परिसंवादात शेतकºयांच्या समस्यांच्या विविध मुद्यांवर एकमत झाले. सदर द्विदिवशीय परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी बाबा खैरकार, सुरेंद्र नाईक, सचिन उगले, जीवन शेंडे, गजानन नेहारे आदींनी सहकार्य केले.