शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

मूल्य निर्धारणासाठी फॉर्म्युला तयार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:33 IST

देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे.

ठळक मुद्देमहादेव विद्रोही : सेवाग्राम येथे राष्टÑीय परिसंवादाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे. शेतमालाचे मुल्य निर्धारित करण्याचा एक फार्म्युला तयार करण्यात यावा, असे प्रतिपादन सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी केले.भारतीय कृषी आवाहन आणि समाधान या विषयावरील सेवाग्राम येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागलू करणे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे, राष्ट्रीय स्तरावर शेतकºयांचे संगठन व विचार पीठ सक्षमपणे निर्माण करणे या मुद्यावर एकमत झाले. यात्री निवासाच्या सभागृहामध्ये २३ व २४ सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावर परिसंवाद सर्व सेवा संघ, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व सद्भावना संघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. समारोपीय कार्यक्रमाला अतिथी म्हणून आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विचार व्यक्त करताना स्वराजाचे आंदोलन उभे करायचे असेल तर शेतकºयांच्या सहभागाशिवाय शक्य नाही, असे गांधीजींचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी असहयोग आंदोलन देशात उभे केले. शरद जोशीच्या आंदोलनाला सर्व सेवा संघाने व सर्वोदयी परिवाराने बळ दिले. शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळालेच पाहिजे. २ आॅक्टोबर हा दिवस गांधीजींची जयंती जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळल्या जातो. पण, सरकारची भूमिका काही वेगळीच दिसत असल्याने सरकारशी पत्रव्यवहार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन अविनाश काकडे यांनी तर आभार शेख हुसैन यांनी मानले. प्रशांत गुजर यांनी यावेळी गीत सादर केले. कार्यक्रमाला डॉ. श्रीराम जाधव, डॉ. शिवचरण ठाकूर, सुदाम पवार, संजय कोल्हे, रामपाल जाट, महेंद्र धावडे, नितीन चौधरी, भीमराव भोयर, रामराव किटे, प्रमोद पाटील, विनायक ताकसांडे, शंकर बगाडे, राजेंद्र कुमज आदी उपस्थित होते.विविध मुद्यांवर एकमतआजच्या समारोपीय सत्रात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यावर अमिताभ पावडे, ग्रामीण व कृषी क्षेत्रात योग्य शिक्षणाच्या अभावामुळे आढळणारी समस्ये या विषयावर प्रा. नूतन माळवी, कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल यावर प्रभूजी श्रीनिवासन यांनी विचार व्यक्त केले. सदर राष्ट्रीय परिसंवादात शेतकºयांच्या समस्यांच्या विविध मुद्यांवर एकमत झाले. सदर द्विदिवशीय परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी बाबा खैरकार, सुरेंद्र नाईक, सचिन उगले, जीवन शेंडे, गजानन नेहारे आदींनी सहकार्य केले.