शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

शेतकऱ्यांचा शिवारी रस्ता बंद करण्याचा वनविभागाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:36 IST

दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर घटनास्थळ गाठून जेसीबीसमोर ठिय्या दिला.

ठळक मुद्देप्रहारच्या मध्यस्तीने निघाला तोडगा : गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : दीडशे वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्याच्या शिवारी रस्त्यावर वनविभागाने आपला मालकी हक्क दाखवित तो रस्ता बंद केला. तेथे सध्या रोपटे लावली जात असून शेतकºयांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट सदर घटनास्थळ गाठून जेसीबीसमोर ठिय्या दिला. त्यानंतर प्रहारचे देवा धोटे यांच्या मदस्तीने समाधानकारक तोडगा निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.आरंभावासियांच्या शेतामध्ये जाण्यासाठी १८८८ मध्ये नकाशानुसार गावकºयाच्या रस्त्याची नोंद होती. त्याच रस्त्यावर स्मशान भूमी सुद्ध आहे. त्यानंतर १९३० ला सुद्धा नोंद आहे. मात्र, त्यानंतर वनविभागाने सदर जागेवर आपला हक्क दाखवित या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी जेसीबी घेऊन आले. ही वार्ता ग्रामस्थांना माहित होताच ग्रामस्थही तेथे धडकले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर माजी आमदार राजू तिमांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. बाबळे, क्षेत्रसहायक जी.व्ही. बोर, वनरक्षक सुरेखा तिजारे, ठाणेदार प्रवीण मुंडे, देवा धोटे, शंकर हरडे, हरिभाऊ हरडे, किसना सोमलकर, विवेक हिवरकर, पुजा हिवरकर, मारोती वानखेडे, सुषमा हिवरकर, कैलास लढी, नंदा हिवरकर, बाबाराव झाडे, यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. तेव्हा ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.१९९९ मध्ये रिकॉर्ड दुरूस्ती होवून वनविभागाला विस्तार अधिकार प्राप्त झाले. त्यावेळी पूर्ण मोजणी करून आम्ही वनविभागाची हद्द निर्धारित केली. मात्र, त्यावेळी गावकºयांनी आपला रस्ता करून घेण्यासाठी कुणीही समोर न आल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची रस्त्याकरिता जागा सोडली नव्हती. परंतु, गावकºयांची रास्त मागणी असल्यामुळे आम्ही तात्पुरता रस्ता त्यांना उपलब्ध करून देत आहोत.- बी. डी. बाबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी.