शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

वन विभागाकडून नुकसानग्रस्तांना १.५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:56 IST

वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान केल्यास तसेच पाळीव प्राणी आणि मनुष्याला जखमी अथवा जीवानिशी ठार केल्यास वनविभागाच्यावतीने नुकसानग्रस्ताला शासकीय मदत दिली जाते.

ठळक मुद्देसात महिन्यांत १,५०१ जणांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान केल्यास तसेच पाळीव प्राणी आणि मनुष्याला जखमी अथवा जीवानिशी ठार केल्यास वनविभागाच्यावतीने नुकसानग्रस्ताला शासकीय मदत दिली जाते. गत सात महिन्यात वनविभागाने १ हजार ५०१ प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरवित त्यांना १ कोटी ५ लाख ३९ हजार ११२ रुपयांची आर्थिक मदत केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.वन्यप्राण्यांकडून जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्या जात असल्याने शेतकºयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतातील उभ्या पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीच्या सुमारास शेतातच मुक्काम करीत असल्याचे वास्तव आहे. बहूदा जंगल परिसर सोडून शेतशिवारात येणारे वन्यप्राणी शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या बैल, शेळी, गाय आदी पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवितात. वन्यप्राण्यांकडून सदर पाळीव प्राण्यांना जखमी अथवा ठार केल्या जाते. शिवाय उभ्या पिकांची नासडीही वन्यप्राणी करीत असल्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नेहमीच शेतकरी करतात.सध्याच्या विज्ञान युगात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना वनविभागाकडे नसल्याचे बोलले जाते. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात झालेल्या नुकसानीपोटी वनविभागाने तीन हजार ६१० प्रकरणे पात्र ठरवित नुकसानग्रस्तांना २ कोटी १५ लाख ४९ हजार ७८४ रुपयांची शासकीय मदत दिली. त्या वर्षी वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना वनविभागाच्यावतीने आठ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली होती.यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात वनविभागाने नुकसानग्रतांना नुकसान भरपाईपोटी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली असली तरी विविध वन्यप्राणी शेतशिवारापर्यंत येणार नाही यासाठी विशेष प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा हवालदील झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना वनविभागाकडून आहे.संत्रा उत्पादकांना प्रती झाड २,४०० रूपयांची मिळतेय मदतजिल्ह्यातील आर्वी, कारंजा, आष्टी तालुक्यासह काही भागातील शेतकरी बºयापैकी संत्रा पिकाचे उत्पन्न घेतात. वन्यप्राण्यांनी संत्रा व मोसंबी झाडाचे नुकसान केल्यास नुकसानग्रस्त शेतकºयाला संत्रा व मोसंबीचे प्रती झाड २ हजार ४०० रुपये नुकसानभरपाई दिली जात असल्याचे सांगण्यात आले.२०१६-१७ मध्ये दिली १.१० कोटींची मदतवनविभागाने सन २०१६-१७ मध्ये सुमारे १ हजार ६९९ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरवून १ कोटी १० लाख ३६ हजार ९२६ रुपयांची शासकीय मदत नुकसानग्रस्तांना दिली आहे. यात शेतीच्या नुकसानीची एक हजार ६०३, पशुधन हानीची ७२ तर मनुष्य जखमी झाल्याच्या २३ प्रकरणांचा समावेश होता.जंगली श्वापदांनी १८ मनुष्यांना गंभीर करीत दोघांना केले ठारवन्यप्राण्यांनी यंदा एप्रिल ते आॅक्टोंबर २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांवर हल्ला चढवित १८ मनुष्यांना जखमी केले. शिवाय दोन जणांना ठार केले. दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना वनविभागाने प्रत्येकी ८ लाखांची मदत तर १८ जखमींना एकूण ११ लाख ९३ हजार ५७७ रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. याच कालावधीत १ हजार ३९४ शेतपिकांच्या नुकसानीची प्रकरणे पात्र ठरवित शेतकºयांना ७० लाख ४९ हजार १७० रुपये तसेच पशुधन हानीचे ८७ प्रकरणांसाठी ६ लाख ९६ हजार ३७५ रुपये शासकीय मदत म्हणून दिली आहे.