शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाकडून नुकसानग्रस्तांना १.५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:56 IST

वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान केल्यास तसेच पाळीव प्राणी आणि मनुष्याला जखमी अथवा जीवानिशी ठार केल्यास वनविभागाच्यावतीने नुकसानग्रस्ताला शासकीय मदत दिली जाते.

ठळक मुद्देसात महिन्यांत १,५०१ जणांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान केल्यास तसेच पाळीव प्राणी आणि मनुष्याला जखमी अथवा जीवानिशी ठार केल्यास वनविभागाच्यावतीने नुकसानग्रस्ताला शासकीय मदत दिली जाते. गत सात महिन्यात वनविभागाने १ हजार ५०१ प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरवित त्यांना १ कोटी ५ लाख ३९ हजार ११२ रुपयांची आर्थिक मदत केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.वन्यप्राण्यांकडून जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्या जात असल्याने शेतकºयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतातील उभ्या पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीच्या सुमारास शेतातच मुक्काम करीत असल्याचे वास्तव आहे. बहूदा जंगल परिसर सोडून शेतशिवारात येणारे वन्यप्राणी शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या बैल, शेळी, गाय आदी पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवितात. वन्यप्राण्यांकडून सदर पाळीव प्राण्यांना जखमी अथवा ठार केल्या जाते. शिवाय उभ्या पिकांची नासडीही वन्यप्राणी करीत असल्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नेहमीच शेतकरी करतात.सध्याच्या विज्ञान युगात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना वनविभागाकडे नसल्याचे बोलले जाते. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात झालेल्या नुकसानीपोटी वनविभागाने तीन हजार ६१० प्रकरणे पात्र ठरवित नुकसानग्रस्तांना २ कोटी १५ लाख ४९ हजार ७८४ रुपयांची शासकीय मदत दिली. त्या वर्षी वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना वनविभागाच्यावतीने आठ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली होती.यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात वनविभागाने नुकसानग्रतांना नुकसान भरपाईपोटी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली असली तरी विविध वन्यप्राणी शेतशिवारापर्यंत येणार नाही यासाठी विशेष प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा हवालदील झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना वनविभागाकडून आहे.संत्रा उत्पादकांना प्रती झाड २,४०० रूपयांची मिळतेय मदतजिल्ह्यातील आर्वी, कारंजा, आष्टी तालुक्यासह काही भागातील शेतकरी बºयापैकी संत्रा पिकाचे उत्पन्न घेतात. वन्यप्राण्यांनी संत्रा व मोसंबी झाडाचे नुकसान केल्यास नुकसानग्रस्त शेतकºयाला संत्रा व मोसंबीचे प्रती झाड २ हजार ४०० रुपये नुकसानभरपाई दिली जात असल्याचे सांगण्यात आले.२०१६-१७ मध्ये दिली १.१० कोटींची मदतवनविभागाने सन २०१६-१७ मध्ये सुमारे १ हजार ६९९ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरवून १ कोटी १० लाख ३६ हजार ९२६ रुपयांची शासकीय मदत नुकसानग्रस्तांना दिली आहे. यात शेतीच्या नुकसानीची एक हजार ६०३, पशुधन हानीची ७२ तर मनुष्य जखमी झाल्याच्या २३ प्रकरणांचा समावेश होता.जंगली श्वापदांनी १८ मनुष्यांना गंभीर करीत दोघांना केले ठारवन्यप्राण्यांनी यंदा एप्रिल ते आॅक्टोंबर २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांवर हल्ला चढवित १८ मनुष्यांना जखमी केले. शिवाय दोन जणांना ठार केले. दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना वनविभागाने प्रत्येकी ८ लाखांची मदत तर १८ जखमींना एकूण ११ लाख ९३ हजार ५७७ रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. याच कालावधीत १ हजार ३९४ शेतपिकांच्या नुकसानीची प्रकरणे पात्र ठरवित शेतकºयांना ७० लाख ४९ हजार १७० रुपये तसेच पशुधन हानीचे ८७ प्रकरणांसाठी ६ लाख ९६ हजार ३७५ रुपये शासकीय मदत म्हणून दिली आहे.