शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

अन्न वाचवा मोहिमेची मुहूर्तमेढ

By admin | Updated: March 29, 2017 00:54 IST

मंगल कार्यालये, हॉटेल तथा उपहारगृहांमध्ये अन्न शिल्लक राहते. शिवाय अनेक जण प्लेटमध्येही अन्न शिल्लक ठेवतात.

मंगल कार्यालयांचा सहभाग : गुढी पाडव्याला शुभारंभ हिंगणघाट : मंगल कार्यालये, हॉटेल तथा उपहारगृहांमध्ये अन्न शिल्लक राहते. शिवाय अनेक जण प्लेटमध्येही अन्न शिल्लक ठेवतात. हे अन्न वाया जात असतानाच काही बालके अन्नाविना मृत्यूमुखी पडतात. ही बाब लक्षात घेत पर्यावरण संवर्धन संस्था व लोकसाहित्य परिषदेच्यावतीने ‘अन्न वाचवा’ ही जणजागृती मोहीम सुरू करण्यात आली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शहरातील मंगल कार्यालयांनी यात सहभाग घेऊन आदर्श घालून दिला आहे. मंगल कार्यालये लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी सोयीस्कर असल्याने शहरी नागरिकांसोबतच आता ग्रामीण भागातील लोकही मंगल कार्यालये शुभ कार्यासाठी वापरताना दिसतात. परिणामी, दररोज बहुतेक कार्यालये बुक असतात. सर्व कार्य जरी यथोचित पार पडले तरी सर्वात मोठी समस्या असते उर्वरित आणि प्लेट्समध्ये शिल्लक ठेवलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे. बुफेचे फॅड असल्याने मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडीच होते. एकीकडे अन्नावाचून मुले मरत असताना मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाऊ नये म्हणून येथील पर्यावरण संवर्धन संस्था आणि लोकसाहित्य परिषदेच्यावतीने ‘अन्न वाचवा’ ही जणजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यातील एक भाग म्हणून हिंगणघाट शहरातील मोठ्या मंगल कार्यालयांच्या संचालकांची भेट घेऊन या समस्येवर चर्चा करण्यात आली. या मोहिमेला मंगल कार्यालय संचालकांनीही सहकार्य करण्याचे ठरविले असून यातून त्यांनी एक अनोखा आदर्शच घालून दिला आहे. मोहिमेला माजी नगरसेवक जनार्धन निखाडे, भास्कर कलोडे, विजय राठी, राजेंद्र राठी, नगरसेवक चंदू मावळे, रमेश दीक्षित, पांडुरंग तुळसकर, जी.एम. लॉनचे भुते, लक्ष्मी कार्यालयाचे महाकाळकर आदींनी सहकार्य करीत मोहीम यशस्वी करण्याची ग्वाही दिली. पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने अन्नाची नासाडी न करता बचतीचे आवाहन करण्यात आले. यावेळी आशिष भोयर, प्रा अभिजीत डाखोरे, प्रदीप गिरडे, रमेश झाडे, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र कोंडावार, मनोहर ढगे, गौरव जामुनकार, गिरीधर काचोळे, योगेश तपासे, छत्रपती भोयर तसेच दोन्ही संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी मंगल कार्यालयांचे अनेक सामाजिक संस्थांनी कौतुक केले असून पर्यावरण प्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले.(तालुका प्रतिनिधी) सहा कार्यालयांमध्ये लावले फलक अन्न वाचवा या मोहिमेच्या अनुषंगाने दोन मोठे फलक तयार करण्यात आले आहेत. यातील एका फलकावर अन्न वाचविणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या फलकावर एका भुकेल्या मुलाचे छायाचित्र काढण्यात आले आहे. तो डॉक्टरला भूक लागू नये म्हणून औषधी मागत असल्याचा आशय रंगविण्यात आला आहे. या फलकांतून अन्न वाचविण्याची पे्ररणा मिळणार आहे. सदर फलक मंगल कार्यालयांतील जेवणाच्या हॉलमध्ये लावण्यात आले आहेत. मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे फलक शहरातील कलोडे सभागृह, निखाडे सभागृह, माहेश्वरी भवन, मोहता भवन, शिवसुमन भवन आणि लक्ष्मी भवन या कार्यालयांमध्ये लावण्यात आले आहेत. या मंगल कार्यालयांच्या संचालकांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.