शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

निम्न वर्धा प्रकल्प घेतला केंद्राने दत्तक

By admin | Updated: April 13, 2016 02:20 IST

केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतला आहे.

रामदास तडस : ६२९ कोटींची तरतूद, २०१७ पर्यंत होणार पूर्ण कामेआर्वी : केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतला आहे. या प्रकल्पातील रखडलेल्या कामासाठी केंद्राच्या बजेटमध्ये ६१९ कोटींची तरतूद केली आहे. २०१७ पर्यंत या प्रकल्पाची रखडलेली संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार आहेत, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.राजापूर येथील बाकळी नदीवरील मोठ्या पुलाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. ६० हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने ५ टक्केच्या वर खर्च झाला, ते सर्व प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतल्याची माहिती यावेळी खा. तडस यांनी दिली. खेडी विकसित होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना ८० लाखांचा निधी देण्याची तरतूद आहे. प्रत्येक तालुका स्तरावर शेतमाल तारण ठेवण्यासाठी ‘कोल्ड स्टोरेज सेंटर’ची निर्मिती करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाराव केचे तर अतिथी म्हणून पं.स. उपसभापती बाळा नांदूरकर, सदस्य वैभव जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहराध्यक्ष मिलिंद डोळे, माजी खासदार विजय मुडे, राजापूरचे सरपंच प्रा. धर्मेंद्र राऊत, ग्रा.पं. सदस्य दिनेश डेहनकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी केचे यांनी निम्न वर्धा प्रकल्प बाधित २४ गावांसाठी नागरी सुविधा झाल्या आहे. यात प्रकल्पग्रस्तांची कामे मार्गी लागणार असून उर्वरित मतदार संघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. मुडे, नांदूरकर यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी राजेश सोळंकी, विजय जयस्वाल यांचाही गौरव करण्यात आला. संचालन करीत आभार गजानन भोरे यांनी मानले. यावेळी उपसरपंच राम सावतकर, सदस्य योगेश ठाकरे, नलिनी ढेपे, सरिता उल्हे, शांता, प्रवीण उईके व ग्रामस्थ हजर होते.(तालुका प्रतिनिधी)