शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

निम्न वर्धा प्रकल्प घेतला केंद्राने दत्तक

By admin | Updated: April 13, 2016 02:20 IST

केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतला आहे.

रामदास तडस : ६२९ कोटींची तरतूद, २०१७ पर्यंत होणार पूर्ण कामेआर्वी : केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतला आहे. या प्रकल्पातील रखडलेल्या कामासाठी केंद्राच्या बजेटमध्ये ६१९ कोटींची तरतूद केली आहे. २०१७ पर्यंत या प्रकल्पाची रखडलेली संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार आहेत, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.राजापूर येथील बाकळी नदीवरील मोठ्या पुलाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. ६० हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने ५ टक्केच्या वर खर्च झाला, ते सर्व प्रकल्प केंद्र शासनाने दत्तक घेतल्याची माहिती यावेळी खा. तडस यांनी दिली. खेडी विकसित होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना ८० लाखांचा निधी देण्याची तरतूद आहे. प्रत्येक तालुका स्तरावर शेतमाल तारण ठेवण्यासाठी ‘कोल्ड स्टोरेज सेंटर’ची निर्मिती करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाराव केचे तर अतिथी म्हणून पं.स. उपसभापती बाळा नांदूरकर, सदस्य वैभव जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहराध्यक्ष मिलिंद डोळे, माजी खासदार विजय मुडे, राजापूरचे सरपंच प्रा. धर्मेंद्र राऊत, ग्रा.पं. सदस्य दिनेश डेहनकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी केचे यांनी निम्न वर्धा प्रकल्प बाधित २४ गावांसाठी नागरी सुविधा झाल्या आहे. यात प्रकल्पग्रस्तांची कामे मार्गी लागणार असून उर्वरित मतदार संघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. मुडे, नांदूरकर यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी राजेश सोळंकी, विजय जयस्वाल यांचाही गौरव करण्यात आला. संचालन करीत आभार गजानन भोरे यांनी मानले. यावेळी उपसरपंच राम सावतकर, सदस्य योगेश ठाकरे, नलिनी ढेपे, सरिता उल्हे, शांता, प्रवीण उईके व ग्रामस्थ हजर होते.(तालुका प्रतिनिधी)