शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

गांधी जयंती साजरी करताना दिलेला शब्दही पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

बांधकाम विभाग सचिव उल्हास देबडवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वर्ध्यात वृक्ष बचाओ नागरिक समितीची भूमिका समजून घेत एकही वृक्ष तोडला जाणार नाही तसेच झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, याबाबत याच सभेत आश्वस्त केले. मात्र अवघ्या दहा दिवसातच पुन्हा वृक्षतोड सुरू झाल्यामुळे नागरिक समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगोपुरी परिसरात वृक्षतोड : वृक्ष बचाओ समितीची तीव्र नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या रस्ता रूंदीकरणाच्या कामादरम्यान होणाऱ्या वृक्ष कटाईला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्थगिती दिली. या कामाबाबत फेरविचार करण्यासाठी सचिवस्तरीय समिती नेमण्यात आली. बांधकाम विभाग सचिव उल्हास देबडवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वर्ध्यात वृक्ष बचाओ नागरिक समितीची भूमिका समजून घेत एकही वृक्ष तोडला जाणार नाही तसेच झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, याबाबत याच सभेत आश्वस्त केले. मात्र अवघ्या दहा दिवसातच पुन्हा वृक्षतोड सुरू झाल्यामुळे नागरिक समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सध्या गोपुरी चौकात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून या भागात रात्रीतून दोन झाडे तोडण्यात आल्याचे दिसून आले. तर याच मार्गावरील काही मोठ्या झाडांची मुळे कापण्यात आली असून काही हिरव्या झाडांच्या खोडावरील साली काढल्या गेल्याने या झाडांना क्षती पोचली आहे. दत्तपूर ते सेवाग्राम या मार्गावरील झाडांच्या उघड्या पडलेल्या मुळ्यांनाही माती टाकून संरक्षित करण्याचे सचिवांच्या उपस्थित झालेल्या सभेत ठरलेले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या या पवित्र्याबद्दल निसर्गप्रेमी नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला असणाºया वृक्षाभोवती दीड मीटर परिघात खोदकाम न करण्याचेही याच सभेत निश्चित करण्यात आले होते. तसेच झाडांभोवती खोदकाम करणे गरजेचेच असेल तर मोठ्या यंत्रांचा वापर न करता मानवी श्रमातून हे काम केले जावे, याबाबतही या सभेत चर्चा करण्यात आली होती. मात्र या सर्व सूचनांना हरताळ फासत आणि निर्णयांचा अवमान करीत ठेकेदारी पद्धतीने कामे करण्यात येत आहे.ज्या महात्मा गांधींनी पर्यावरणाबाबत जागृत राहून या परिसरात मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची झाडे लावली, त्या महात्म्याची जयंती वृक्षांना संरक्षण देऊन साजरी करावी, असे आवाहन वृक्ष बचाओ नागरिक समितीद्वारे करण्यात आले आहे. गोपुरी परिसरात वृक्ष तोडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.