शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

आचार संहितेचे पालन करा

By admin | Updated: October 19, 2016 01:22 IST

जिल्ह्यातील ६ नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जाहीर केला.

शैलेश नवाल : सहा पालिकांची निवडणूक वर्धा : जिल्ह्यातील ६ नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जाहीर केला. २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीकरिता १७ आॅक्टोबरपासून संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे. यामुळे सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. राजकीय पक्षांना निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. २२ डिसेबर २०१६ रोजी मुदत संपणाऱ्या वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, सिंदी, पुलगाव अशा सहा पालिकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. यासाठी २४ आॅक्टोबरपासून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र देण्यास सुरुवात होणार आहे. २९ आॅक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्र भरून सादर करण्याची अंतिम मुदत २९ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी व ते मागे घेणे २ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजता सुरु होईल. त्याच दिवशी वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यन्त उमेदवारी मागे घेता येईल. उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप १२ नोव्हेंबर रोजी करण्यात येऊन त्याच दिवशी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे, नागरिकांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन देण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. सभेसाठी परवानगी घेतल्याशिवाय सभा घेऊ नये. तसेच पक्षाच्या उमेदवारांच्या वाहनालाही परवानगी घ्यावी लागेल. राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसहिंतेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैठकीत केले.(प्रतिनिधी)