शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

वनकर्मचाऱ्यांकडून चारा पिकाची सवंगणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:10 IST

खरांगणा तथा हिंगणी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाने शेतकरी, शेतमजूरच नव्हे तर वन विभागालाही त्रस्त केले आहे. वाघांनी कड्याळूच्या शेतात बस्तान मांडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवाघाच्या दहशतीचा परिणाम : वनाधिकाऱ्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : खरांगणा तथा हिंगणी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाने शेतकरी, शेतमजूरच नव्हे तर वन विभागालाही त्रस्त केले आहे. वाघांनी कड्याळूच्या शेतात बस्तान मांडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पर्याय म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी स्वत: हजर राहून वनमजुरांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील कड्याळू कापून घेत आहेत.खरांगणा व हिंगणी वन परिक्षेत्रांतर्गत सुसूंद, सुसंंूद (हेटी), बोरगाव (गोंडी), माळेगाव (ठेका), रायपूर, आमगाव आदी गावांत वाघाने धुमाकूळ घातला आहे. सुसंूद, बोरगाव (गोंडी) भागात तर पाळीव प्राण्यांच्या शिकारीचा सपाटाच लावला. याच काळात आमगावातील चेतन खोब्रागडे या युवकाचा बळी गेला. दररोज वेगवेगळ्या भागात वाघाचे दर्शन होत आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या कड्याळूचा भाग वाघाने आश्रयस्थान बनविल्याने चारापीक काढता आले नाही. आता खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. अशा वेळी चारापीक काढून शेतीची मशागत करावी लागणार आहे; पण चारापीक सवंगणी करायला कसे जायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. यावर वनविभाग मदतीला धावून आला. वनविभागाचे अधिकारी स्वत: हजर राहून वनरक्षक व वनमजुराला सोबतीला आणत चारा पिकाची सवंगणी करीत आहेत.वाघाने वनमजुरांना बनविले शेतमजूरशेतकरी, शेतमजुरांमध्ये वाघाने धडकी भरविली आहे. परिणामी, यंदा खरीपाची पेरणी, जागली कशी करावी, ही चिंता त्यांना त्रस्त करीत आहे. मदनी, बोरखेडी, आमगाव (म.) भागापर्यंत वाघाने मजल मारली आहे. शिवाय खरांगणा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बोरखेडी गावात सलग तीन दिवसांपासून बिबटही आपल्या पिल्लांसह गावात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती तथा संतापही दिसून येत आहे.शेतकºयाने तशी भीती व्यक्त केली तर स्वत: हजर राहून वनरक्षक व वनमजुरांना मदतीला देऊन कड्याळूची कापणी करतो. काल-परवा मेघराज पेठे नामक शेतकऱ्याने कड्याळू पिकात वाघ असल्याचे सांगितले. स्वत: गेलो व वनकर्मचाऱ्यांना सवंगणी करायला लावली. शेतकरी दहशतीत आहे, हे खरे आहे. यात आमचीही दमछाक होत आहे.- ए. एस. ताल्हण, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.

टॅग्स :Tigerवाघ