शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘फॉडर कॅफेटेरिया’ प्रकल्प पाण्याअभावी मरणपंथाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:20 IST

ग्रामीण भागातील दुधाळू गायी, म्हशींना ओला चारा मिळावा, चाºयाच्या माध्यमातून भरपूर दुधासोबतच चांगल्या प्रतिचे दूध मिळावे आणि गोपालकांचेही उत्पन्न वाढून चाराटंचाईवर मात करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, अल्लीपूर व सिंदी (रेल्वे) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या २० गुंठे जागेची फॉडर कॅफेटेरियाचे बेणे (चारा) लागवडीसाठी निवड करण्यात आली होती.

ठळक मुद्देसाडेसहा लाखांचा खर्च : गुरांच्या चाऱ्याच्या प्रश्न भेडसावणार

योगेश वरभे ।लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : ग्रामीण भागातील दुधाळू गायी, म्हशींना ओला चारा मिळावा, चाºयाच्या माध्यमातून भरपूर दुधासोबतच चांगल्या प्रतिचे दूध मिळावे आणि गोपालकांचेही उत्पन्न वाढून चाराटंचाईवर मात करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, अल्लीपूर व सिंदी (रेल्वे) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या २० गुंठे जागेची फॉडर कॅफेटेरियाचे बेणे (चारा) लागवडीसाठी निवड करण्यात आली होती.९ मार्च २०१६ रोजी शासनाच्या वतीने फॉडर कॅफेटेरियाचा प्रकल्प राबविण्याचा आदेश देण्यात आला होता. झाशी व हैदराबाद येथील २७ प्रजातींच्या चाºयाची रोपे आणून लावण्याते आली, जेणेकरून गोपालकांच्या चाराटंचाईवर मात करून उत्पन्नवाढीसही मदत होईल.परंतु, अल्लीपूर येथील एका जागेवरील चारा प्रकल्प पाण्याअभावी कोरडा पडला असून अखेरच्या घटका मोजत आहे. दवाखान्यात तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे विहीर, विंधन विहीर पाणी नसल्याने रोपे वाळू लागली आहे. तातडीने नवीन कूपनलीकेची व्यवस्था केल्यास उन्हाळ्यात चारा उपलब्ध होईल तसेच बेणेही शेतकºयांना उपलब्ध होईल, अन्यथा उन्हाळ्यात दुधाळू जनावरांची हेळसांड होऊन शेतकºयांच्या उत्पन्नात घट येईल. कारंजा येथे एक लाख बेणे, हिंगणघाट येथे ८० हजार, समुद्रपूर येथे ९० हजार बेणे वितरित करण्यात आले होते. आता मात्र वाळलेले बुंधे तेवढेच शिल्लक राहिलेले आहेत.चाराटंचाईवर मात करण्यासोबतच भरपूर दूध आणि त्या माध्यमातून गोपालकही समृद्ध व्हावेत या अनुषंगाने बेण्यांची लागवड करण्यात आली. मात्र, महत्त्वपूर्ण या प्रकल्पाला पाण्याअभावी फटका सहन करावा लागत आहे.दवाखान्यात पाण्याचे मुबलक साधन उपलब्ध नसल्यामुळे चाºयाला पाणी देणे शक्य होत नाही. कूपनलिकेला पाणी नसल्याने येथे पाणीटंचाई आहे.- डॉ. अमित लोहकरे, पशुधन विकास अधिकारी, अल्लीपूर.चारा बेणे दवाखान्यात उपलब्ध नसल्याने दुधाळू जनावरांना अडचण येत आहे. बेण्याला मुबलक व २४ तास पाणी देणे गरजेचे आहे.- अरविंद साखरकर, दुग्ध उत्पादक शेतकरी, अल्लीपूर.