शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना सुविधा देण्यावर भर द्या

By admin | Updated: September 30, 2015 05:48 IST

देवळीच्या औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरिता एमआयडीसीने पुढाकार घेऊन

वर्धा : देवळीच्या औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात सामायिक सुविधा केंद्र उभारणीकरिता एमआयडीसीने पुढाकार घेऊन याबाबत पाठपुरावा करावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील उद्योजकांना आवश्यक असलेल्या मुलभूत विकासाच्या सोयी-सुविधांवर अधिक भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, लघु उद्योग भारतीचे भूषण वैद्य, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. बी. संगीतराव, आर. ई. खोब्रागडे, उपअभियंता एन.एस. निखारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हेमणे, महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. आर. कांबळे, कार्यकारी अभियंता एन. जी. वैरागडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी व्ही. एस. लामटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सुरेश गणराज, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे डॉ. एम. एम. पट्टेबहादूर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी विवे तोंडरे, उद्योजक रवी गुप्ता, हरिष हांडे, संजय जाधव आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या दृष्टीने नियमानुसार ज्यांनी उद्योग उभारणे आवश्यक असतानाही अद्याप उद्योग उभारलेला नाही, तसेच अनधिकृत भागीदारीतून संपूर्णपणे बाहेर पडलेले आहेत, अशा भूखंडावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या देवळीतील सामाजिक सुविधा केंद्राची निर्मिती करण्यासाठी आवश्यक परवानगीसाठी योग्य तो पाठपुरावा करावा, ट्रक उभे करण्यास आवश्यक असलेल्या या भागातील ट्रक टर्मिनलसाठी औद्योगिक संघटनेने प्रस्ताव द्यावा, देवळी औद्योगिक परिसरातील उद्योग घटकांना कमी प्रमाणातील पाणीपुरवठ्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याबाबत देवळीच्या महालक्ष्मी टीएमटीतर्फे निवेदन दिलेले आहे. यावर महामंडळाच्या उपअभियंत्यांनी केलेल्या कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करून पाठपुरावा करण्याच्या सलिल यांनी यावेळी दिल्या.(शहर प्रतिनिधी)४जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या दृष्टीने नियमानुसार ज्यांनी उद्योग उभारणे आवश्यक असतानाही अद्याप उद्योग उभारलेला नाही, तसेच अनधिकृत भागीदारीतून संपूर्णपणे बाहेर पडलेले आहेत अशा भूखंडावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यानी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या. तसेच कार्यवाहीचा अहवाल जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करण्याच्या सूचना केल्या.