शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

कापूस दरात चढ-उतार शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:18 IST

राज्यात उत्कृष्ट कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले आहे.

ठळक मुद्देउत्पादन निम्म्यावर : सरकारकडून मदतीची अपेक्षा

आॅनलाईन लोकमतवर्धा : राज्यात उत्कृष्ट कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले आहे. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील दोन-तीन दिवसांत ५ हजार १०० रुपयांवर आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.वर्धा जिल्ह्यात खरीपात कापूस हेच मुख्य पीक आहे. यावर्षी कापसावर लाल्या व बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. परिणामी, कापसाचे बोंड पूर्णत: सडून गेले. त्यातून कापूस निघाला नाही. अनेक शेतकºयांनी डिसेंबर महिन्यातच कपाशी उपटून फेकली. यामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे. एकरी उत्पादनातही मोठी घट आल्याने कापसाचे भाव तेजीत राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. डिसेंबर महिन्याच्या पुर्वार्धात कापसाचा भाव ५६०० रुपये क्विंटलपर्यंत वाढला होता; पण डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात हा भाव आता ५१०० रुपयांवर आला आहे. यावर्षी शेतकºयांना कपाशीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. कपाशी उंच वाढल्याने फवारणीचाही खर्च वाढला. शिवाय कापसाच्या वेचाईचे काम रोजीचे मजूर लावून करावे लागले. यामुळे किलोमागे दीडशे रुपये अतिरिक्त मोजावे लागले. आधीच शेतकरी अडचणीत असताना बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा नागपूर हिवाळी अधिवेशनात करण्यात आली. प्रती हेक्टर ३० हजार रुपये मदत देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी अद्याप याबाबत कुठलीही कार्यवाही सुरू झालेली नाही. काही भागात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कापसाला बोनस जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनातून केली होती; पण शासनाने बोनस जाहीर केला नाही. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट, आर्वी हे सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ आहे. येथे भाव अतिशय कमी आहे. व्यापारी सरकारच्या हमीभावापेक्षाही कमी भाव देत असल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी कापसाचा भाव वाढेल म्हणून कापूस विकाला नाही; पण आता भाव ५१०० रुपयांवर आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.शासकीय खरेदी थंडचकापूस पणण महासंघ, नाफेड व सिसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण जिल्ह्यात शासकीय कापूस संकलन केंद्रावर फारशी कापसाची खरेदी झाली नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस प्रारंभीच व्यापाऱ्यांना विकल्याने त्यांना अल्प भाव मिळाला.कापसाचे दर दिवसेंदिवस घसरत आहे. उत्पादन खर्च अधिक झाला. बोंडअळी व इतर रोगांनी कपाशीचे उत्पन्न नाममात्र झाले. शासनाने एकरी भरघोस मदत दिली तरच शेतकरी सावरू शकतो. अन्यथा कर्जमाफीनंतरही पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी कर्जबाजारीपणा ठरलेलाच आहे. कपाशीला चांगले भाव मिळणे आवश्यक आहे.- पप्पू बोबडे, प्रगतशील युवा शेतकरी, वडगाव (कला), ता. सेलू.कापसाचे कमी-जास्त होणारे भाव शेतकऱ्यांना बुचकळ्यात टाकणारे आहे. या आठवड्यात ५५०० रुपयांपर्यंत असलेले भाव ५००० रुपयांवर आले आहेत. अनेकांनी ६ हजार रुपयांपर्यंत भाव अपेक्षित धरून कापूस साठवून ठेवला आहे. आधीच कमी उत्पादनामुळे शेतकरी अडचणीत असताना तो व्यापाºयांच्या भावबाजीत भरडला जाऊ नये.- संतोष मरघाडे, शेतकरी, देवळी.बाजारपेठेत सरकीला उठाव नाही. यामुळे कापसाचे भाव कमी आहेत. शिवाय आवक कमी असल्यानेही भाव पडत आहेत. सद्यस्थितीत आठवडाभर तरी भाव वाढण्याची शक्यता नाही.- गुड्डू चांडक, व्यापारी, आर्वी.