शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा कळप रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:05 IST

शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक नियंत्रक पोलीस नसतो.

ठळक मुद्देवाहनधारक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात : नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील रेल्वेस्थानक चौकापासून नाचणगाव रोड, कॅम्प रोड तसेच इतर लहान रस्त्यांवर मोकाट जनावरे मागील काही दिवसांपासून ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्यावरील जनावरांच्या ठिय्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार यांना जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागते. परिणामी, बरेचदा लहान-मोठे वाहनात अपघात होऊन रस्त्यावरील पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो.शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक नियंत्रक पोलीस नसतो. या ठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस सावजाच्या शोधात इतरत्र फिरत असतात. वाहतूक पोलीस व यंत्रणा चिरीमिरी मिळविण्याच्या नादात डोळेझाक करते. त्यामुळे स्टेशन चौकात वाहतूक नियंत्रित होत नसल्याने अनेकदा अपघात होतात. नाचणगाव रोडवरील पं. दीनदयाल चौकात १० ते १२ जनावरांचा कळप ठाण मांडून असतो. हेच चित्र आर. के. हायस्कूलपासून पुढे पहायला मिळते. वास्ताविक मोकाट जनावरांना पकडून संबंधित पशुपालकांवर कारवाई करण्याचे काम पालिका व पोलीस प्रशासनाचे आहे. मात्र, हा विभाग बघ्याची भूमिका घेऊन आहे. मोकाट जनावरांकडे पोलीस व नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक असून या प्रकाराकडे लक्ष देवून वाहनचारकांचा जीव वाचवून वाहतूक सुरळीत करण्याची गरज आहे. स्टेशन चौकात कर्तव्यावर असणाºया वाहतूक पोलिसांनी इतरत्र न भटकता चौकातील वाहतूक नियंत्रित करण्याकडेच लक्ष पुरविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या तर लहानमोठ्या अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे बोलले जात आहे.वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्तआर्वी - सध्या शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर विचार करण्याची आवश्यकता आहे. शहरातील वाढती वाहनांची संख्या, रस्त्याची स्थिती, रस्त्यावरील व चौकातील अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहन चालकांचा निष्काळजीपणा, वाहनाकरिता पार्किंगची योग्य व्यवस्था नसणे आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. आर्वी शहरातील शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाण्यासाठी प्रथम विचार पडतो की, डावीकडून जावे की रस्त्याच्या उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच दुकानासमोर वाहने उभे राहत असल्यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दोन्ही बाजूला असलेल्या दुकानामध्ये वाहने उभे केली जात असल्याने, शिवाय फळ-भाजीविक्रेत्यामुळे रस्त्यावर वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाड्याकडे जाणाºया रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. रोडवर अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत मोठेमोठे खड्डे पडले आहे. हा अमरावतीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे, यावर विश्वास बसणार नाही. अनेक अडथळे पार करीत वाहन अमरावतीकडे निघते. शिवाजी चौकाकडून बसस्थानकाकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या रांगेतून रस्ता शोधत वाहन चालवावे लागते. आर्वी शहरातील प्रत्येक मुख्य चौकात रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या व लोकांची गर्दीच जास्त असते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा