शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मोकाट जनावरांचा कळप रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:05 IST

शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक नियंत्रक पोलीस नसतो.

ठळक मुद्देवाहनधारक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात : नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील रेल्वेस्थानक चौकापासून नाचणगाव रोड, कॅम्प रोड तसेच इतर लहान रस्त्यांवर मोकाट जनावरे मागील काही दिवसांपासून ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्यावरील जनावरांच्या ठिय्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार यांना जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागते. परिणामी, बरेचदा लहान-मोठे वाहनात अपघात होऊन रस्त्यावरील पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो.शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक नियंत्रक पोलीस नसतो. या ठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस सावजाच्या शोधात इतरत्र फिरत असतात. वाहतूक पोलीस व यंत्रणा चिरीमिरी मिळविण्याच्या नादात डोळेझाक करते. त्यामुळे स्टेशन चौकात वाहतूक नियंत्रित होत नसल्याने अनेकदा अपघात होतात. नाचणगाव रोडवरील पं. दीनदयाल चौकात १० ते १२ जनावरांचा कळप ठाण मांडून असतो. हेच चित्र आर. के. हायस्कूलपासून पुढे पहायला मिळते. वास्ताविक मोकाट जनावरांना पकडून संबंधित पशुपालकांवर कारवाई करण्याचे काम पालिका व पोलीस प्रशासनाचे आहे. मात्र, हा विभाग बघ्याची भूमिका घेऊन आहे. मोकाट जनावरांकडे पोलीस व नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक असून या प्रकाराकडे लक्ष देवून वाहनचारकांचा जीव वाचवून वाहतूक सुरळीत करण्याची गरज आहे. स्टेशन चौकात कर्तव्यावर असणाºया वाहतूक पोलिसांनी इतरत्र न भटकता चौकातील वाहतूक नियंत्रित करण्याकडेच लक्ष पुरविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या तर लहानमोठ्या अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे बोलले जात आहे.वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्तआर्वी - सध्या शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर विचार करण्याची आवश्यकता आहे. शहरातील वाढती वाहनांची संख्या, रस्त्याची स्थिती, रस्त्यावरील व चौकातील अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहन चालकांचा निष्काळजीपणा, वाहनाकरिता पार्किंगची योग्य व्यवस्था नसणे आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. आर्वी शहरातील शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाण्यासाठी प्रथम विचार पडतो की, डावीकडून जावे की रस्त्याच्या उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच दुकानासमोर वाहने उभे राहत असल्यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दोन्ही बाजूला असलेल्या दुकानामध्ये वाहने उभे केली जात असल्याने, शिवाय फळ-भाजीविक्रेत्यामुळे रस्त्यावर वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाड्याकडे जाणाºया रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. रोडवर अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत मोठेमोठे खड्डे पडले आहे. हा अमरावतीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे, यावर विश्वास बसणार नाही. अनेक अडथळे पार करीत वाहन अमरावतीकडे निघते. शिवाजी चौकाकडून बसस्थानकाकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या रांगेतून रस्ता शोधत वाहन चालवावे लागते. आर्वी शहरातील प्रत्येक मुख्य चौकात रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या व लोकांची गर्दीच जास्त असते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा