शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अतिक्रमणधारकांची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:41 IST

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सदर जागेचे कायम स्वरूपी पट्टे मोफत देण्यात यावे, ....

ठळक मुद्दे‘युवा परिवर्तन की आवाज’चे पालकमंत्र्यांना साकडे

ऑनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सदर जागेचे कायम स्वरूपी पट्टे मोफत देण्यात यावे, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन रविवारी राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर करण्यात आले.शासकीय जागांवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची आर्थिकस्थिती नाजूक आहे. त्यांना आपल्या स्वप्नातील घर बांधणेही कठीण वाटते. ज्या जागेवर ते राहत आहेत ती जागा शासकीय असली तरी झोपड्यांमध्ये त्यांनी संसार थाटला आहे. सदर जागेचे त्यांना अद्यापही कायमस्वरूपी पट्टे न मिळाल्याने त्यांना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ घेता येत नाही. अतिक्रमण धारकांना जागेचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत देण्यात आली. परंतु, अद्यापही समस्या कायम आहे. सदर समस्येशी आपल्याला अवगत करून देण्यासाठी व समस्या निकाली निघावी यासाठी २२ फेब्रुवारीला युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर पोलिसांकडे रितसर आंदोलनासाठी परवानगी मागीतली;पण त्यांच्याकडून परवानगी नाकारण्यात आली.शिवाय त्याच दिवशी आपण योगगुरू रामदेवबाबा यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने सदर समस्या आपल्या पर्यंत आम्हाला मांडता आली नाही. वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना जागेचे नि:शुल्क पट्टे देण्यासाठी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास वर्धा ते नागपूर अशी भु-देव यात्रा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.निवेदन देताना निहाल पांडे, पलाश उमाटे, कोमल झाडे, सोनु दाते, अक्षय बाळसराफ, सौरभ मोकाडे, यश सातपूते, अनिकेत मुन, तेजस भोयर यांच्यासह युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चर्चेतही तोडगा नाहीस्थानिक जुना आरटीओ मैदान भागात आयोजित कार्यक्रमात निवेदन दिल्यानंतर युवा परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक विश्रामगृहात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सदर मागणीवर निवेदन देऊन चर्चा केली. परंतु, यावेळी समाधानकारक तोडगा न निघाल्याने युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात २० ते २३ मार्च दरम्यान वर्धा ते नागपूर अशी भु-देव यात्रा काढण्यात येणार असल्याचे युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार