शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

अतिक्रमणधारकांची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:41 IST

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सदर जागेचे कायम स्वरूपी पट्टे मोफत देण्यात यावे, ....

ठळक मुद्दे‘युवा परिवर्तन की आवाज’चे पालकमंत्र्यांना साकडे

ऑनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सदर जागेचे कायम स्वरूपी पट्टे मोफत देण्यात यावे, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन रविवारी राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर करण्यात आले.शासकीय जागांवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची आर्थिकस्थिती नाजूक आहे. त्यांना आपल्या स्वप्नातील घर बांधणेही कठीण वाटते. ज्या जागेवर ते राहत आहेत ती जागा शासकीय असली तरी झोपड्यांमध्ये त्यांनी संसार थाटला आहे. सदर जागेचे त्यांना अद्यापही कायमस्वरूपी पट्टे न मिळाल्याने त्यांना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ घेता येत नाही. अतिक्रमण धारकांना जागेचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत देण्यात आली. परंतु, अद्यापही समस्या कायम आहे. सदर समस्येशी आपल्याला अवगत करून देण्यासाठी व समस्या निकाली निघावी यासाठी २२ फेब्रुवारीला युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर पोलिसांकडे रितसर आंदोलनासाठी परवानगी मागीतली;पण त्यांच्याकडून परवानगी नाकारण्यात आली.शिवाय त्याच दिवशी आपण योगगुरू रामदेवबाबा यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने सदर समस्या आपल्या पर्यंत आम्हाला मांडता आली नाही. वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना जागेचे नि:शुल्क पट्टे देण्यासाठी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास वर्धा ते नागपूर अशी भु-देव यात्रा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.निवेदन देताना निहाल पांडे, पलाश उमाटे, कोमल झाडे, सोनु दाते, अक्षय बाळसराफ, सौरभ मोकाडे, यश सातपूते, अनिकेत मुन, तेजस भोयर यांच्यासह युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चर्चेतही तोडगा नाहीस्थानिक जुना आरटीओ मैदान भागात आयोजित कार्यक्रमात निवेदन दिल्यानंतर युवा परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक विश्रामगृहात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सदर मागणीवर निवेदन देऊन चर्चा केली. परंतु, यावेळी समाधानकारक तोडगा न निघाल्याने युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात २० ते २३ मार्च दरम्यान वर्धा ते नागपूर अशी भु-देव यात्रा काढण्यात येणार असल्याचे युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार