शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

पाच वर्षे पूर्ण तरी काम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:35 IST

तालुक्यात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करून विकासकामाचा झंझावात असल्याचे लोकप्रतिनिधी दाखवित आहेत. भूमिपूजन होवून आज पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना तहसील कार्यालय व आरोग्य विभागाची इमारत मात्र पूर्णत्त्वास गेली नाही.

ठळक मुद्दे२०१३ मध्ये झाले भूमिपूजन : वर्षभरापासून बांधकामाला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : तालुक्यात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करून विकासकामाचा झंझावात असल्याचे लोकप्रतिनिधी दाखवित आहेत. भूमिपूजन होवून आज पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना तहसील कार्यालय व आरोग्य विभागाची इमारत मात्र पूर्णत्त्वास गेली नाही. यामुळे येथील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२६ एप्रिल २०१३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सेलू तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाची नवीन इमारत व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. या अगोदरच बांधकामाला सुरुवात झाली होती. याच दिवशी तत्कालीन पाणी पुरवठा आणि स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते तत्कालीन आमदार सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला आता पाच वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत तहसील कार्यालयाची व रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानाची इमारत आजही अर्धवटच आहे. नव्हे तर एक वर्षापासून निवासस्थानाच्या इमारतीचे बांधकाम थांबले आहे.एकीकडे भूमिपून समारंभाचे सोहळे तालुक्यात सुरू असतांना या दोन महत्त्वपूर्ण इमारतीच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्याचे दुर्लक्ष कसे हा तालुकावासीयांकरिता चर्चेचा विषय ठरत आहे.तहसील कार्यालय अद्यापही भाड्याच्या इमारतीतगत सहा वर्षांपुर्वी नव्या इमारतीकरिता तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडण्यात आली. त्या काळापासून येथील तहसील कार्यालयाचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे या इमारत बांधकामाला प्राधान्य देण्याची गरज आहे,अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली.आरोग्यसेवेकडे दुर्लक्षकर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारत येथे नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाही. तालुकावासियांना उत्तम आरोग्य सेवा मिळत नाही. या कारणामुळे निवास स्थानासाठी शासनाने निधी मंजूर केला; पण अर्धवट थांबलेले बांधकाम पाहुन विकासकामाच्या वेगावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.भूमिपूजन करणाऱ्यांनाच उद्घाटनाची संधीया दोन्ही महत्त्वपूर्ण इमारतीचे भूमिपूजन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व लोकप्रतिनिधीनी केले. त्याला पाच वर्षे पूर्ण झाली. अर्धवट राहिलेल्या बांधकामासाठी पुन्हा आघाडी शासन येईल व काम पूर्ण होईल, ज्यांनी भूमिपूजन केले तेच उद्घाटन तर करणार नाही ना, अशी खोचक प्रतिक्रिया तालुकावासी या बांधकामाबाबत देत असल्याचे दिसते.