शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाच वर्षे पूर्ण तरी काम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:35 IST

तालुक्यात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करून विकासकामाचा झंझावात असल्याचे लोकप्रतिनिधी दाखवित आहेत. भूमिपूजन होवून आज पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना तहसील कार्यालय व आरोग्य विभागाची इमारत मात्र पूर्णत्त्वास गेली नाही.

ठळक मुद्दे२०१३ मध्ये झाले भूमिपूजन : वर्षभरापासून बांधकामाला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : तालुक्यात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करून विकासकामाचा झंझावात असल्याचे लोकप्रतिनिधी दाखवित आहेत. भूमिपूजन होवून आज पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना तहसील कार्यालय व आरोग्य विभागाची इमारत मात्र पूर्णत्त्वास गेली नाही. यामुळे येथील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२६ एप्रिल २०१३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सेलू तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाची नवीन इमारत व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. या अगोदरच बांधकामाला सुरुवात झाली होती. याच दिवशी तत्कालीन पाणी पुरवठा आणि स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते तत्कालीन आमदार सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला आता पाच वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत तहसील कार्यालयाची व रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानाची इमारत आजही अर्धवटच आहे. नव्हे तर एक वर्षापासून निवासस्थानाच्या इमारतीचे बांधकाम थांबले आहे.एकीकडे भूमिपून समारंभाचे सोहळे तालुक्यात सुरू असतांना या दोन महत्त्वपूर्ण इमारतीच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्याचे दुर्लक्ष कसे हा तालुकावासीयांकरिता चर्चेचा विषय ठरत आहे.तहसील कार्यालय अद्यापही भाड्याच्या इमारतीतगत सहा वर्षांपुर्वी नव्या इमारतीकरिता तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडण्यात आली. त्या काळापासून येथील तहसील कार्यालयाचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे. त्यामुळे या इमारत बांधकामाला प्राधान्य देण्याची गरज आहे,अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली.आरोग्यसेवेकडे दुर्लक्षकर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारत येथे नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाही. तालुकावासियांना उत्तम आरोग्य सेवा मिळत नाही. या कारणामुळे निवास स्थानासाठी शासनाने निधी मंजूर केला; पण अर्धवट थांबलेले बांधकाम पाहुन विकासकामाच्या वेगावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.भूमिपूजन करणाऱ्यांनाच उद्घाटनाची संधीया दोन्ही महत्त्वपूर्ण इमारतीचे भूमिपूजन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व लोकप्रतिनिधीनी केले. त्याला पाच वर्षे पूर्ण झाली. अर्धवट राहिलेल्या बांधकामासाठी पुन्हा आघाडी शासन येईल व काम पूर्ण होईल, ज्यांनी भूमिपूजन केले तेच उद्घाटन तर करणार नाही ना, अशी खोचक प्रतिक्रिया तालुकावासी या बांधकामाबाबत देत असल्याचे दिसते.