शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांचे पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 23:21 IST

मागील वर्षीच्या तूलनेत यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे. दररोजी येळाकेळी व पवनार येथील धाम नदीतून वर्धा न.प. प्रशासन ३२ एमएलडी पाण्याची उलच करीत असून वर्धेकऱ्यांच्या वाट्याला सध्या केवळ पाच महिन्यांचे पाणी शिल्लक आहे.

ठळक मुद्देवर्धेकरांवर जलसंकटाचे सावट : दररोज लागते ३२ एमएलडी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील वर्षीच्या तूलनेत यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे. दररोजी येळाकेळी व पवनार येथील धाम नदीतून वर्धा न.प. प्रशासन ३२ एमएलडी पाण्याची उलच करीत असून वर्धेकऱ्यांच्या वाट्याला सध्या केवळ पाच महिन्यांचे पाणी शिल्लक आहे. पुढील काळात जोरदार पाऊस न झाल्यास वर्धेकरांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परिणामी, प्रत्येकाने आता पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.धाम नदीवरील धाम प्रकल्प वर्धेकरांच्या ऋृष्णातृप्तीसाठी फायद्याचा आहे. या प्रकल्पात साठविलेले पाणी पाटबंधारे विभाग वेळोवेळी सोडत असल्याने व त्याची उचल करून न.प. प्रशासन ते शुद्ध करून त्याचा पुरवठा वर्धेकरांना करीत असल्याने उन्हाळ्या दिवसातही वर्धेकरांना पिण्यायोग्य मुबलक पाणी मिळते. वर्धा न.प. प्रशासन पवनार व येळाकेळी येथील धाम नदीतून दररोज ३२ एमएलडी उचल करते. शिवाय उचल करण्यात आलेले पाणी शुद्ध करून त्यापैकी २७ एमएलडी पाणीचा वर्धा न.प. प्रशासन वर्धेतील सुमारे १५ हजार कुटुंबियांना पुरवठा करते. परंतु, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने ऐरवी डिसेंबर मध्ये वर्धेकरांवर ओढावणारी परिस्थिती सप्टेंबर महिन्यातच ओढावली आहे. सध्या स्थितीत केवळ पाच महिने पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. इतकेच नव्हे तर सध्या धाम प्रकल्पात केवळ ३८ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. भविष्यातील जलसंकटावर कशी मात करता येईल यासाठी सध्या न.प. प्रशासन नियोजनबद्ध कार्यक्रम आखत आहे.धाम मध्ये फक्त ३८ टक्के जलसाठाउन्हाळ्याच्या दिवसात तसेच अल्प पाऊस झाल्यावर नागरिकांना धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो. या प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे येळाकेळी व पवनार येथील धाम नदीच्या जलपातळीत वाढ होते. शिवाय धाम नदीपात्रातून उचल करण्यात आलेले पाणी शुद्ध करून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. परंतु, सध्या स्थितीत धाम प्रकल्पात केवळ ३८ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात आले.नळाला तीन दिवसाआड पाणी येण्याची शक्यताभविष्यातील जल संकट लक्षात घेवून सध्या वर्धा न.प. प्रशासन उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करीत आहे. सध्या एक दिवसाआड नळाला पाणी येत असले तरी येत्या काही दिवसात वर्धा न.प. प्रशासन नागरिकांसाठी तीन दिवसाआड पाणी सोडण्याचा विचार करीत आहे. संभाव्य जलसंकट लक्षात घेवून वर्धा न.प. च्यावतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाला जिल्हाधिकाºयांनी हिरवी झेंडी दिल्यावर तीन दिवसाआड नळाला पाणी येणार आहे.पाटबंधारे विभागाने वेळोवेळी प्रकल्पातून पाणी सोडल्यास योग्य नियोजन करून वर्धेकरांना आम्ही पाच महिने पाणी देऊ शकतो. परंतु, येत्या काही दिवसात जोरदार पाऊस न आल्यास जलसंकटाची समस्या निर्माण होणार आहे.- निलेश नंदनवार, अभियंता, न.प. पाणी पुरवठा विभाग, वर्धा.