शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सव्वा पाच कोटींच्या विकास कामांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:34 IST

येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यावर सेलू गावाचा विकास करण्याकरिता शासनाने नविन नगरपंचायत योजनेंतर्गत सव्वा पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. हा निधी थेट नगरपंचयातला मिळणे अपेक्षित असताना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामाला सुरुवात केली.

ठळक मुद्देदर्जाहीन कामामुळे रोष : सा.बां.कडून कंत्राटदाराची पाठराखण

प्रफुल्ल लुंगे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यावर सेलू गावाचा विकास करण्याकरिता शासनाने नविन नगरपंचायत योजनेंतर्गत सव्वा पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. हा निधी थेट नगरपंचयातला मिळणे अपेक्षित असताना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामाला सुरुवात केली. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला हाताशी धरुन दर्जाहीन कामाव्दारे विकासाची वाट लावली.शहरात वेगवेगळ्या प्रभागात सिमेंट रस्ते, नाली बांधकाम तर खाटीकपुºयात मटन मार्केटचे बांधकाम करण्यात आले. या सर्व बांधकामाचा कंत्राट जे.पी.एंटर प्रायजेस मुंबईला देण्यात आला. पण, प्रत्यक्ष काम मात्र पेटी कंत्राटदार सोनू मेश्राम करीत आहे. वाळूची उपलब्धता नसल्याने चुरी वापरण्याची मोकळीक देण्यात आली. तरी पेटी कंत्राटदाराने चुरीचाही वापर न करता वेकोलीच्या कारखान्याची राख वापरली आहे.सिमेटसह राखीचा वापर केल्याने चार महिन्यातच एक नाही तर सर्वच कामातील सदोषतेची पोलखोल झाली आहे. याबाबत लोकमने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत केवळ देखावा केला.उपअभियंता अनिल तोटे यांनी कंत्राटदाराला जाब विचारणे सोडून ज्या प्रभागात कामे झाली तेथील नागरिकांकडून काम चांगले झाल्याबाबतचे लिहून घेण्याचा अट्टहास चालविला. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त करुन अभियंता कंत्राटदाराची बाजू का घेतात? असा प्रश्न उपस्थित केला.त्यामुळे या कामांची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे.कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकायेथील रस्ता, नाली व मटन मार्केटचे बांधकाम सदोष असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. शहरातील कोट्यवधी निधीचा चुराडा होत असतानाही नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवक यांनी काम बंद पाडण्याकरिता पुढाकार का घेतला नाही? असा संतप्त प्रश्नही नागरिकांकडून विचारल्या जात आहे.आता तरी कामाचे मुल्यांकन करताना कंत्राटदाराचे देयक काढू नये याची दक्षता घ्यावी व कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते करीत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याने शहरात निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने आता सामाजिक कार्यकर्तेच आंदोलनाच्या तयारीत आहे.