शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री पाच घरफोड्या

By admin | Updated: August 12, 2016 01:36 IST

संपूर्ण शहर झोपेत असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहरातील गांधी नगर, हरिराम नगर, टिळक नगर भागात चोरट्यांनी पाच कुलूपबंध घराचे कुलूप तोडून

पुलगावात चोरांची दहशत : दोन दुचाकी व मोबाईलसह लाखांचा ऐवज लंपास पुलगाव : संपूर्ण शहर झोपेत असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहरातील गांधी नगर, हरिराम नगर, टिळक नगर भागात चोरट्यांनी पाच कुलूपबंध घराचे कुलूप तोडून रोख, सोने, चांदीचे दागिने दोन दुचाकी व दोन मोबाईल असा एकूण दोन लाखांचा ऐवज लंपास केला. या सहाही ठिकाणी सारख्याच पद्धतीने चोरी केल्याचे दिसून आले. या चोरींची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चोरीचा तपास करण्याकरिता वर्धा येथून शोध व ठसे तज्ज्ञांची चमू व श्वानपथक दाखल झाले. गांधी नगरातील विनोद खेडकर हे घराला कुलूप लावून परिसरातील त्यांच्या मोठ्या भावाकडे झोपायला गेले होते. ते सकाळी घरी आले असता घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी घरात पाहणी केली असता कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घरातून ८ ते १० ग्रॅम सोन्याची साखळी व ३ हजार ५०० रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. याच भागातील निरूपमा यादव या हिंगणघाट येथे नोकरी करतात. त्यांच्या घरालाही कुलूप होते. त्यांच्या घराचेही कूलूप तोडल्याचे सकाळी दिसून आले; पण चोरट्यांनी त्यांच्या घरातून काय लंपास केले हे कळू शकले नाही. सचिन कोंबे यांनी घरासमोर ठेवलेली एमएच ३२ के ६७५६ क्रमांकाची दुचाकीही या चोरट्यांनी लंपास केली. हरिराम नगर परिसरातील अशोक चावके हे वरच्या मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी खालच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले व कपाटातील १४ हजाराचे चांदीचे भांडे तसेच १५ हजार रुपये रोख दोन मोबाईल असा एकूण २५ हजार रुपये व अंगणात ठेवलेली ६२ हजार रुपये किंमतीची एम.एच.३२/५०५२ क्रमांकाची दुचाकी लंपास केल्याचे चावके यांनी सांगितले. टिळक नगरात जाधव यांच्या शेजारी राहणाऱ्या एका घराचे कुलूप चोरट्यांनी तोडले. घरात राहणाऱ्या मुली बाहेरगावी गेल्यामुळे येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. या चोरीचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ व शोध पथक, श्वान पथक शहरात दाखल झाले आहे. एकाच रात्री घडलेल्या या चोऱ्यांमुळे शहरात भीती निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त सुरू करावी अशी नागरिकांची ओरड आहे.(तालुका प्रतिनिधी)