शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संचालकासह पाच जणांवर गुन्हा; कारवाई शून्यच

By admin | Updated: February 21, 2017 01:09 IST

स्थानिक औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये एका कामगाराच्या मृत्यू झाला होता.

महालक्ष्मी कंपनी प्रकरण : देवळी पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा देवळी : स्थानिक औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये एका कामगाराच्या मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळी पोलिसांनी उशिरा का होईना संचालकासह पाच व्यक्तीविरुद्ध शनिवारी देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून तीन दिवसांचा कालावधी झाला तरी कारवाईच्या नावावर येथे काहीच झाले नाही. या प्रकरणात कारवाई करण्याकरिता पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. असे असले तरी होणाऱ्या कारवाईकडे जनतेचे लक्ष लागले आहे. देवळी औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये मध्य प्रदेशातील राठी येथील सुनील कोका कुंभरे (२५) हा कामगार कार्यरत होता. दरम्यान ३१ डिसेंबर २०१६ रोजी कंपनीत त्याचा अपघात झाला. या घटनेची तक्रार देवळी ठाण्यात न करता जखमी सुनील कुंभरे याला नागपुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान ३ जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. कंपनी व्यवस्थापनाने नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करुन हे प्रकरण पुढील तपासाकरिता ५ जानेवारीला देवळी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. पण, कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता. या कंपनीत नेहमी अपघात होऊनही गुन्हे दाखल झाले नव्हते. कामगार संघटनांच्या दबावामुळे कारवाई देवळी : कंपनीत जखमी झालेल्या सुनील कुंभरे मृत्यूप्रकरणही विस्मरणात जाणार काय, असा सवाल कामगार संघटनांनी उपस्थित केला. कामगार व संघटनांचा दबाव वाढू लागल्याने ठाणेदार चंद्रकांत मदणे यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले. लगेच चौकशीला गती देत शनिवारी रात्री पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीजचे संचालक योगेश मंदानी, व्यवस्थापक प्रजावीर आचार्य, कंत्राटदार महेंद्र रॉय, अग्निशमन अधिकारी प्रसाद अनिल कुकेकर, पाळीप्रमुख महावीर शिवलाल पुच्छकर आदींचा समावेश आहे. कामगार मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच सहायक फौजदार युवराज बाभळे यांनी फिर्याद नोंदविली होती.(प्रतिनिधी)प्रकरण दडपण्याचा प्रयत्नमहालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीजने प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. कंपनीत नेहमीच अपघात होतात. मात्र ही प्रकरणे बाहेर येऊ दिले जात नाही. कामगाराचा अपघात झाल्यानंतर गुप्तरित्या नागपूरातील खासगी रुग्णालयात भरती केले जाते. वाच्यात केल्यास नोकरीतून काढण्याची धमकी मिळते. अशीही कामगारांमध्ये दबक्या सुरात चर्चा आहे. सहा कामगारांची कधी होणार चौकशी?२ फेब्रुवारी २०१७ ला सहा कामगार जखमी झाले होते. त्यांना तातडीने नागपूरात उपचार करुन प्रकरण गुंडाळण्यात आले. व्यवस्थापनाने या घटनेची तक्रार अद्याप देवळी ठाण्यात केली नाही. मागील एक वर्षात अशी अनेक प्रकरणे दडपण्यात आले, असा आरोप कामगार संघटनांनी केला. यासंदर्भात ठाणेदार मदणे यांना विचारल्यानंतर म्हणाले, अपघातग्रस्त सहा कामगारांची चौकशी सुरू केली. सर्व पुरावे हाती आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.