शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

मच्छिमारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: July 2, 2017 01:06 IST

मासेमारांबाबत शासन निर्णय स्पष्ट नाही. यामुळे प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था व प्रत्यक्ष मासे पकडून उदरनिर्वाह करणारे अडचणीत आले आहेत.

समस्या सोडविण्यासाठी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मासेमारांबाबत शासन निर्णय स्पष्ट नाही. यामुळे प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था व प्रत्यक्ष मासे पकडून उदरनिर्वाह करणारे अडचणीत आले आहेत. परिणामी, राज्यातील मच्छिमार भोई समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. याकडे लक्ष देत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा मच्छिमार सहकारी संघाने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील मच्छिमार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती मागासलेपणाची आहे. स्वातंत्र्यानंतर समाजाचा विकास खुंटला आहे. पारंपरिक मच्छी व्यवसाय करणारे चुकीच्या शासकीय धोरणामुळे व समाज विरोधी जाचक अटींमुळे अडचणीत आले आहेत. ३० जून २०१७ रोजी तलावाची लीज संपत आहे; पण अद्याप लिलाव वा वाटाघाटीच्या सूचना संस्थांना प्राप्त झाल्या नाही. यामुळे ० ते २०० हेक्टरपर्यंतचे तलाव कुणाला दिले जाणार, हा प्रश्नच आहे. भूमिहिन व बेघर मच्छिमारांना मासे पकडण्याशिवाय पर्याय नाही. यावर त्वरित निर्णय घेत मासेमारांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष कमलेश मारबडे यांनी केली. निवेदन सादर करताना समुद्रपूर, सेलू, आर्वी, कारंजा तालुक्यातील मच्छिमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख मागण्या ० ते २०० हेक्टरपर्यंत संपूर्ण तलाव ३ जूनपर्यंत मच्छिमार सहकारी संस्थांना विनाविलंब द्यावे, २०० हेक्टरवरील संपूर्ण तलाव देताना प्रथम तलावावर नोंदणी झालेल्या संस्थांना प्राधान्याने देण्याचा विचार करून ठेकेदार संपुष्टात आणावे, ठेकेदाराला दिलेले तलाव रद्द करावे, मच्छिमारांसाठी लागणारी साधने, मत्स्यबिज, होड्या, जाळे आदी नवीन धोरण निर्धारित करून ० टक्के अनुदानावर द्यावे, पाणी साठ्याच्या प्रमाणात लीजची आकारणी करावी, उत्तर प्रदेश पॅटर्नप्रमाणे तलावाचा सातबारा मच्छिमार सहकारी संस्थांच्या नावे करावा, महामंडळाकडील संपूर्ण तलाव रद्द करून संस्थांना वर्ग करावे, ५०० रुपये महिना परवाना पद्धत लागू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.