शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

मच्छिमारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: July 2, 2017 01:06 IST

मासेमारांबाबत शासन निर्णय स्पष्ट नाही. यामुळे प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था व प्रत्यक्ष मासे पकडून उदरनिर्वाह करणारे अडचणीत आले आहेत.

समस्या सोडविण्यासाठी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मासेमारांबाबत शासन निर्णय स्पष्ट नाही. यामुळे प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था व प्रत्यक्ष मासे पकडून उदरनिर्वाह करणारे अडचणीत आले आहेत. परिणामी, राज्यातील मच्छिमार भोई समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. याकडे लक्ष देत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा मच्छिमार सहकारी संघाने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील मच्छिमार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती मागासलेपणाची आहे. स्वातंत्र्यानंतर समाजाचा विकास खुंटला आहे. पारंपरिक मच्छी व्यवसाय करणारे चुकीच्या शासकीय धोरणामुळे व समाज विरोधी जाचक अटींमुळे अडचणीत आले आहेत. ३० जून २०१७ रोजी तलावाची लीज संपत आहे; पण अद्याप लिलाव वा वाटाघाटीच्या सूचना संस्थांना प्राप्त झाल्या नाही. यामुळे ० ते २०० हेक्टरपर्यंतचे तलाव कुणाला दिले जाणार, हा प्रश्नच आहे. भूमिहिन व बेघर मच्छिमारांना मासे पकडण्याशिवाय पर्याय नाही. यावर त्वरित निर्णय घेत मासेमारांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष कमलेश मारबडे यांनी केली. निवेदन सादर करताना समुद्रपूर, सेलू, आर्वी, कारंजा तालुक्यातील मच्छिमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख मागण्या ० ते २०० हेक्टरपर्यंत संपूर्ण तलाव ३ जूनपर्यंत मच्छिमार सहकारी संस्थांना विनाविलंब द्यावे, २०० हेक्टरवरील संपूर्ण तलाव देताना प्रथम तलावावर नोंदणी झालेल्या संस्थांना प्राधान्याने देण्याचा विचार करून ठेकेदार संपुष्टात आणावे, ठेकेदाराला दिलेले तलाव रद्द करावे, मच्छिमारांसाठी लागणारी साधने, मत्स्यबिज, होड्या, जाळे आदी नवीन धोरण निर्धारित करून ० टक्के अनुदानावर द्यावे, पाणी साठ्याच्या प्रमाणात लीजची आकारणी करावी, उत्तर प्रदेश पॅटर्नप्रमाणे तलावाचा सातबारा मच्छिमार सहकारी संस्थांच्या नावे करावा, महामंडळाकडील संपूर्ण तलाव रद्द करून संस्थांना वर्ग करावे, ५०० रुपये महिना परवाना पद्धत लागू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.