शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

मच्छिमारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: July 2, 2017 01:06 IST

मासेमारांबाबत शासन निर्णय स्पष्ट नाही. यामुळे प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था व प्रत्यक्ष मासे पकडून उदरनिर्वाह करणारे अडचणीत आले आहेत.

समस्या सोडविण्यासाठी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मासेमारांबाबत शासन निर्णय स्पष्ट नाही. यामुळे प्राथमिक मच्छिमार सहकारी संस्था व प्रत्यक्ष मासे पकडून उदरनिर्वाह करणारे अडचणीत आले आहेत. परिणामी, राज्यातील मच्छिमार भोई समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. याकडे लक्ष देत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा मच्छिमार सहकारी संघाने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील मच्छिमार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती मागासलेपणाची आहे. स्वातंत्र्यानंतर समाजाचा विकास खुंटला आहे. पारंपरिक मच्छी व्यवसाय करणारे चुकीच्या शासकीय धोरणामुळे व समाज विरोधी जाचक अटींमुळे अडचणीत आले आहेत. ३० जून २०१७ रोजी तलावाची लीज संपत आहे; पण अद्याप लिलाव वा वाटाघाटीच्या सूचना संस्थांना प्राप्त झाल्या नाही. यामुळे ० ते २०० हेक्टरपर्यंतचे तलाव कुणाला दिले जाणार, हा प्रश्नच आहे. भूमिहिन व बेघर मच्छिमारांना मासे पकडण्याशिवाय पर्याय नाही. यावर त्वरित निर्णय घेत मासेमारांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष कमलेश मारबडे यांनी केली. निवेदन सादर करताना समुद्रपूर, सेलू, आर्वी, कारंजा तालुक्यातील मच्छिमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख मागण्या ० ते २०० हेक्टरपर्यंत संपूर्ण तलाव ३ जूनपर्यंत मच्छिमार सहकारी संस्थांना विनाविलंब द्यावे, २०० हेक्टरवरील संपूर्ण तलाव देताना प्रथम तलावावर नोंदणी झालेल्या संस्थांना प्राधान्याने देण्याचा विचार करून ठेकेदार संपुष्टात आणावे, ठेकेदाराला दिलेले तलाव रद्द करावे, मच्छिमारांसाठी लागणारी साधने, मत्स्यबिज, होड्या, जाळे आदी नवीन धोरण निर्धारित करून ० टक्के अनुदानावर द्यावे, पाणी साठ्याच्या प्रमाणात लीजची आकारणी करावी, उत्तर प्रदेश पॅटर्नप्रमाणे तलावाचा सातबारा मच्छिमार सहकारी संस्थांच्या नावे करावा, महामंडळाकडील संपूर्ण तलाव रद्द करून संस्थांना वर्ग करावे, ५०० रुपये महिना परवाना पद्धत लागू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.