शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीनंतर पहिल्या वर्षातच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 11:03 IST

Wardha News गेल्या वर्षी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध झाले; परंतु गेल्या वर्षीही निसर्गाने दगाफटका केल्याने शेतकरी कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरले. परिणामी यावर्षी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्काही घटला.

ठळक मुद्देपीक कर्जाचाही टक्का घसरला दुष्काळीस्थितीमुळे नूतनीकरणाकडे पाठ

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांवर वाढलेला कर्जाचा भार कमी करण्याकरिता दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध झाले; परंतु गेल्या वर्षीही निसर्गाने दगाफटका केल्याने शेतकरी कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरले. परिणामी यावर्षी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्काही घटला.

जिल्ह्यातील ५१ हजार ९१४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. या शेतकऱ्यांकडील जवळपास ४५९ कोटींचे कर्ज शासनाने माफ केले. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध झाले. ज्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला त्यांचेसह नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांनीही कर्जाची उचल केल्याने खरिपाकरिता ६५ टक्क्यांपेक्षा अधिक कर्जवाटप करण्यात आले होते; पण मागील वर्षी अतिवृष्टी आणि खोडकिडीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा कायम असल्याने यावर्षी पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. यावर्षी जुलै महिना संपत आला तरी केवळ ३५ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. सन २०२१-२२ या वर्षाकरिता ८५० कोटींचे लक्ष्य दिले होते. यात ३०० कोटींची वाढ करून ११५० कोटी करण्यात आले. त्यापैकी केवळ ३०२ कोटींचे कर्ज २६ हजार ३६ शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी पीक कर्जाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

सावकारी फास होतोय घट्ट

जिल्ह्यात मागील वर्षी शेतकऱ्यांना निसर्गाने चांगलाच दणका दिल्याने लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कर्जाचे संकट उभे ठाकले. बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड न केल्याने यावर्षी खरीप हंगामाकरिता बँकांकडून पीक कर्ज मिळण्यासाठी दारे बंद झाली. त्यामुळे शेती कसण्याकरिता शेतकऱ्यांना नाइलाजास्तव सावकाराच्या दारात पाय ठेवावा लागला. यंदा सावकारांनीही मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले असून, यात अनधिकृत सावकारीही फोफावली आहे. त्यामुळे शासनाने अनधिकृत सावकारीचा बीमोड करण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेती