शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

१९३० च्या जंगल सत्याग्रह भूमीवर ८७ वर्षांनी प्रथमच ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:08 IST

नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने १९३० मध्ये प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून तळेगावची निवड केली. १ आॅगस्ट १९३० रोजी येथील गडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपत टिकेकर व श्रीधर दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले.

ठळक मुद्देस्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ध्वजवंदनाचा मान अंकिता होले यांना

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने १९३० मध्ये प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून तळेगावची निवड केली. १ आॅगस्ट १९३० रोजी येथील गडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपत टिकेकर व श्रीधर दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले. चार-चारचे शेकडो गट गारगोटी गडाच्या माथ्यावर शिस्तबद्धरित्या जात होते. यावेळी धास्तावलेल्या इंग्रजांनी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्ह्यातील सर्वात मोठे आंदोलन म्हणून राज्य गॅझेटीअर बुकमध्ये तळेगाव जंगल सत्याग्रहाची नोंद आहे. या गडावर १९३० नंतर ८७ तर स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिरंगा एकता संदेशाने प्रभावित होऊन आदरांजली वाहण्यासाठी भाजयुमोचे महामंत्री राहुल बुले यांनी तिरंगा एकता रॅलीचे आयोजन केले होते. याबाबत शासनाच्या सर्व विभागांना रितसर माहिती देऊनही पोलीस ठाणे व वनपरिक्षेत्र तळेगाव यांनी जंगल सत्याग्रह भूमीवर ध्वजारोहण व आदरांजली वाहण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. यामुळे २५ जानेवारी रोजी रात्री भाजप कार्यकर्ते व प्रशासनात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. यावेळी भाजपाचे नेते मुकूंद ठाकरे व सहकाºयांनी विभाग प्रमुखांशी सामंजस्याने चर्चा करून जंगल सत्याग्रहाची सुरूवात झालेल्या गडाजवळील मैदानात ध्वजारोहण तर गारगोटीच्या माथ्यावर आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम, असा तोडगा निघाला. उपविभागीय अधिकारी आर्वी यांनी पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेत रॅलीला रितसर परवानगी दिली.गणराज्यदिनी सकाळी १० वाजता राष्ट्रसंत चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. यानंतर जि.प. सदस्य अंकिता होले यांच्या हस्ते गडाजवळील मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. तेथून रॅलीद्वारे गारगोटीच्या माथ्यावर जाऊन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी हेमलता भगत, आशा निंभोरकर, कमल कुलधरीया, कमलाकर निंभोरकर, सुरेश नागपुरे, वेद खा पठाण, शरद दिघडे, दत्तात्रय पुसदेकर, सुनील मोहेकर, प्रशांत कडू, नंदू जाधव उपस्थित होते.या तिरंगा एकता उपक्रमाने अनेक वर्षांनंतर पहिल्यादांच तळेगावसह पंचक्रोशीत देशभक्तीचे भारावणारे वातावरण निर्माण झाले होते. जंगल सत्याग्रहाच्या इतिहासाला उजाळा देत ध्वजारोहण तथा आदरांजली कार्यक्रमाला शेकडो महिला, पुरूष, युवक, युवती गडावर व गारगोटीच्या माथ्यावर उपस्थित होते.कारावास प्रमाणपत्रही ठरले पुरावा१९३० च्या आंदोलनातील एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. बापूराव सदुजी भोयर रा. खडका यांना प्राप्त झालेले अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह नागपूर यांचे कारावास प्रमाणपत्र त्यांचे दत्तकपुत्र मनोहर भुयार रा. तळेगाव यांच्याकडे समितीला प्राप्त झाले. त्या प्रमाणपत्रात ८ आॅगस्ट १९३० रोजी वन कायद्याच्या कलम २६ (९) अन्वये वर्ग २ न्यायालय आर्वी यांनी भोयर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. यात १७ आॅगस्ट रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करून ७ नोव्हेंबर १९३० रोजी सुटका केल्याचे नमूद आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून त्यांना शासनाकडून १९८० पर्यंत मानधन मिळत होते, हे विशेष!जंगल सत्याग्रह व इतिहासातील तळेगावचे महत्त्व याबाबत मागील अनेक वर्षांपासून सत्याग्रह स्मारक समिती संशोधन करीत आहे. त्यांनी अनेक पुरावे गोळा केले. या इतिहासाबद्दल कुणाकडे माहिती वा पुरावे असल्यास त्यांनी सचिन होले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे.