शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

१९३० च्या जंगल सत्याग्रह भूमीवर ८७ वर्षांनी प्रथमच ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:08 IST

नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने १९३० मध्ये प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून तळेगावची निवड केली. १ आॅगस्ट १९३० रोजी येथील गडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपत टिकेकर व श्रीधर दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले.

ठळक मुद्देस्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ध्वजवंदनाचा मान अंकिता होले यांना

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने १९३० मध्ये प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून तळेगावची निवड केली. १ आॅगस्ट १९३० रोजी येथील गडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपत टिकेकर व श्रीधर दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले. चार-चारचे शेकडो गट गारगोटी गडाच्या माथ्यावर शिस्तबद्धरित्या जात होते. यावेळी धास्तावलेल्या इंग्रजांनी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्ह्यातील सर्वात मोठे आंदोलन म्हणून राज्य गॅझेटीअर बुकमध्ये तळेगाव जंगल सत्याग्रहाची नोंद आहे. या गडावर १९३० नंतर ८७ तर स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिरंगा एकता संदेशाने प्रभावित होऊन आदरांजली वाहण्यासाठी भाजयुमोचे महामंत्री राहुल बुले यांनी तिरंगा एकता रॅलीचे आयोजन केले होते. याबाबत शासनाच्या सर्व विभागांना रितसर माहिती देऊनही पोलीस ठाणे व वनपरिक्षेत्र तळेगाव यांनी जंगल सत्याग्रह भूमीवर ध्वजारोहण व आदरांजली वाहण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. यामुळे २५ जानेवारी रोजी रात्री भाजप कार्यकर्ते व प्रशासनात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. यावेळी भाजपाचे नेते मुकूंद ठाकरे व सहकाºयांनी विभाग प्रमुखांशी सामंजस्याने चर्चा करून जंगल सत्याग्रहाची सुरूवात झालेल्या गडाजवळील मैदानात ध्वजारोहण तर गारगोटीच्या माथ्यावर आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम, असा तोडगा निघाला. उपविभागीय अधिकारी आर्वी यांनी पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेत रॅलीला रितसर परवानगी दिली.गणराज्यदिनी सकाळी १० वाजता राष्ट्रसंत चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. यानंतर जि.प. सदस्य अंकिता होले यांच्या हस्ते गडाजवळील मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. तेथून रॅलीद्वारे गारगोटीच्या माथ्यावर जाऊन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी हेमलता भगत, आशा निंभोरकर, कमल कुलधरीया, कमलाकर निंभोरकर, सुरेश नागपुरे, वेद खा पठाण, शरद दिघडे, दत्तात्रय पुसदेकर, सुनील मोहेकर, प्रशांत कडू, नंदू जाधव उपस्थित होते.या तिरंगा एकता उपक्रमाने अनेक वर्षांनंतर पहिल्यादांच तळेगावसह पंचक्रोशीत देशभक्तीचे भारावणारे वातावरण निर्माण झाले होते. जंगल सत्याग्रहाच्या इतिहासाला उजाळा देत ध्वजारोहण तथा आदरांजली कार्यक्रमाला शेकडो महिला, पुरूष, युवक, युवती गडावर व गारगोटीच्या माथ्यावर उपस्थित होते.कारावास प्रमाणपत्रही ठरले पुरावा१९३० च्या आंदोलनातील एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. बापूराव सदुजी भोयर रा. खडका यांना प्राप्त झालेले अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह नागपूर यांचे कारावास प्रमाणपत्र त्यांचे दत्तकपुत्र मनोहर भुयार रा. तळेगाव यांच्याकडे समितीला प्राप्त झाले. त्या प्रमाणपत्रात ८ आॅगस्ट १९३० रोजी वन कायद्याच्या कलम २६ (९) अन्वये वर्ग २ न्यायालय आर्वी यांनी भोयर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. यात १७ आॅगस्ट रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करून ७ नोव्हेंबर १९३० रोजी सुटका केल्याचे नमूद आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून त्यांना शासनाकडून १९८० पर्यंत मानधन मिळत होते, हे विशेष!जंगल सत्याग्रह व इतिहासातील तळेगावचे महत्त्व याबाबत मागील अनेक वर्षांपासून सत्याग्रह स्मारक समिती संशोधन करीत आहे. त्यांनी अनेक पुरावे गोळा केले. या इतिहासाबद्दल कुणाकडे माहिती वा पुरावे असल्यास त्यांनी सचिन होले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे.