शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २०,६६६ विद्यार्थ्यांची पहिली शैक्षणिक परीक्षा

By admin | Updated: March 7, 2017 01:09 IST

शैक्षणिक जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याची पहिली परीक्षा म्हणून ओळख असलेल्या दहावीची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे.

आजपासून दहावीची परीक्षा : एकूण ७६ केंद्र; शिक्षण विभागासह तहसील व गटविकास अधिकाऱ्यांची विशेष तपासणी पथकेवर्धा : शैक्षणिक जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याची पहिली परीक्षा म्हणून ओळख असलेल्या दहावीची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. या परीक्षेत जिल्ह्यातील एकूण २० हजार ६६६ विद्यार्थी राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याकरिता एकूण ७६ परीक्षा केंद्र आहेत. जिल्ह्यात दहावीच्या अनेक शाळा आहेत. या शाळांत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता ही परीक्षा महत्त्वाची आहे. येथूनच पुढे कोणत्या शाखेत जावे याचा विचार करण्यात येतो. यामुळे ही परीक्षा जीवनातील वळणरस्ता म्हणूनही ओळखल्या जात आहे. हीच परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याकरिता शिक्षण विभागाकडून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेकरिता निवड करण्यात संपूर्ण ७६ परीक्षा केंद्रांची शिक्षण विभागाच्या परीक्षा मंडळाने तपासणी केली असून तसा अहवाल नागपूर परीक्षा विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. (प्रतिनिधी) कॉपीमुक्त परीक्षेकरिता २२ पथकांची केंद्रांवर नजर जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्याकरिता शिक्षण विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची माहितीही देण्यात आली. हा उपक्रम गत काही वर्षांपासून सुरू असून परीक्षेत कॉपीचे प्रमाण मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे. होत असलेल्या या प्रकारावर आळा बसविण्याकरिता एकूण २२ पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाची परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करडी नजर राहणार आहे. यात शिक्षण विभागाची सहा भारारी पथके असून तालुका स्तरावर तहसीलदारांची आठ आणि गटविकास अधिकाऱ्यांची आठ पथके समाविष्ट आहेत. ११ कस्टोडीयन कार्यरत जिल्ह्यातील ७६ परीक्षा केंद्रावर माहिती पुरविण्याकरिता एकूण ११ कस्टोडीयन नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्र व उत्तरपत्रिका पोहोचविण्यासह परीक्षेनंतर त्यांचे संकलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.