शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पवनारात साकारणार जिल्ह्यातील पहिली ‘ई-लायब्ररी’

By admin | Updated: December 10, 2015 02:20 IST

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांच्या अवांतर वाचनावर भर देणे आवश्यक आहे. त्यातच वाचनाची माध्यमेही ...

हर्षल तोटे पवनारविद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांच्या अवांतर वाचनावर भर देणे आवश्यक आहे. त्यातच वाचनाची माध्यमेही बदलून त्यात अनेक ईलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शिरकाव केला आहे. हीच बाब हेरून पवनार येथील ग्रामपंचायतने नागरी सुविधा योजनेंतर्गत ई-लायब्ररी तयार करण्याचा ठराव पारित केला आहे. एवढेच नव्हे तर निर्मितीप्रक्रियेलाही सुरूवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळी ही लायब्ररी जिल्ह्यातील पहिली ई-लायब्ररी ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी आणि विनोबांचे गाव अशी पवनारची ओळख आणखी प्रगल्भ व्हावी, यासाठी हा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ही लायब्ररी वाय फाटा युक्त राहणार असून विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार युवकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. या लायब्ररीमध्ये स्पर्धा परीक्षेकरिता लागणारी पुस्तके, काम्प्युटर्स, इंटरनेट, शेती उपयोगी पुस्तके, मासिकं यासह विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी लागणारे संपूर्ण अभ्यासोपयोगी साहित्य येथे उपलब्ध होणार असल्याची माहिती सरपंच अजय गांडोळे यांनी दिली. याकरिता लागणारा निधी नागरी सुविधा योजनेंतर्गत अभ्यास केंद्र या सदराखाली उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्यामध्येही पवनार विभागातील अनेक योजना समाविष्ट करण्यात आला असून पर्यटनाच्या सुविधेवर भर देण्यात आला आहे. नंदी खेडा परिसरात सुद्धा १९.८६ लक्ष रू. सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले असून १३ लक्ष रूपयांच्या सभागृहाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. यामुळे नंदीखेडा परिसरात उत्तरक्रियेसाठी येणाऱ्या नागरिकांची अडचण दूर होणार आहे. त्याचप्रकारे २०१४-१५ चा वार्षिक अहवाल सुद्धा ग्रा. पं. ने आपल्या करदात्यांना देऊन नवीन पायंडा पाडला आहे. करदात्यांना आपल्या कराचा वापर कश्यासाठी होतो ही माहिती देणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असल्याचे सरपंच अजय गांडोळे सांगतात. कर रूपातून व शासनाच्या विविध योजनेंतर्गत जमा झालेल्या निधीपैकी ३७ लक्ष ४१ हजार २८८ रू. नागरी सुविधेंतर्गत खर्च झाले आहे. एप्रिल अखेरची अंतिम शिल्लक १५ लक्ष ४७ हजार ७३० रू. दाखविण्यात आले आहे. अश्या प्रकारचा वार्षिक अहवाल करदात्यांना देणारी पवनार ही जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरणार आहे. असे असतानाही महिलांनी पुढाकार घेऊनसुद्धा दारूबंदीची चळवळ मात्र काही प्रमाणात क्षीण झालेली दिसते. त्यामुळे गावात संपूर्ण दारूबंदी असतानाही दारूचे पाट मात्र वाहतच आहे. याकडेही लक्ष देत दारूबंदीसाठी एखादा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.