शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

श्री साबाजी अ‍ॅग्रोटेकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:36 IST

ईसापूर येथील श्री साबाजी अ‍ॅग्रोटेक कारखान्याला आग लागली. यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीचे कुटार जळून भस्मसात झाले. ही आग शनिवारी दुपारी तीन वाजता लागुन रात्री उशीरापर्यंत धुमसत होती. यात कारखाना मालकाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देपाच लाखांचे नुकसान : सोयाबीन, तूर व पºहाटीचे कुटार खाक

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी: ईसापूर येथील श्री साबाजी अ‍ॅग्रोटेक कारखान्याला आग लागली. यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीचे कुटार जळून भस्मसात झाले. ही आग शनिवारी दुपारी तीन वाजता लागुन रात्री उशीरापर्यंत धुमसत होती. यात कारखाना मालकाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.आगीवर ताबा मिळविण्याकरिता देवळी, पुलगाव नगर परिषदेसह सीएडी कॅम्प पुलगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचा काही भाग धुमसत असल्याचे लक्षात आल्याने रविवारी पूर्ण दिवसापर्यंत ही आग देवळी न.प. अग्निशामक दलाच्या सहाय्याने विझविण्यात आली. या आगीत पाच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.ईसापूर येथील यवतमाळ-वर्धा महामार्गावर स्थानिक नरेश अग्रवाल यांच्या मालकीचा श्री साबाजी अ‍ॅग्रोटेक कारखाना कार्यरत आहे. या कारखान्यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीच्या कुटारापासून व्हाईट कोल तयार करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळे याठिकाणी तिन्ही पीक मालाच्या कुटाराची मोठ्या प्रमाणात साठवणूक होती. घटनेच्या दिवशी परिसरातील कास्तकारांनी शेतधुऱ्यांना लावलेली आग, कारखान्यापर्यंत पोहचल्याने कुटाराने पेट घेतला. कारखान्याच्या चारही बाजुने ही आग लागल्याने देवळी न.प. तसेच पुलगाव येथील न.प. व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. घटनेच्या दुसऱ्या दिवसपर्यंत ही आग धुमसत होती.शेतधुºयांना लावलेल्या आगीमुळे याआधी सुद्धा रस्त्याचे दुतर्फा लावलेली झाडे जळून खाक झाल्याच्या अनेक घटना घडून लाखोंचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.