शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांतील अग्निसुरक्षा यंत्रणा नाममात्रच

By admin | Updated: May 8, 2014 02:06 IST

परिसरात कापूस जंतुजन्य तसेच तेल उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र सुरक्षा विषयक सूचनांना उद्योजक वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याने दरवर्षी आगीमुळे..

भास्कर कलोडे■ हिंगणघाटपरिसरात कापूस जंतुजन्य तसेच तेल उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र सुरक्षा विषयक सूचनांना उद्योजक वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याने दरवर्षी आगीमुळे मनुष्य हानी व कोट्यवधीची वित्त हानी होत आहे. प्रशासकीय यंत्रणांकडून मात्र कारवाई होत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. देवळीतील घटनेने सुरक्षेची बाब पुन्हा ऐरणीवर आली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक तेल व कापूस प्रक्रिया उद्योग हिंगणघाट परिसरात आहे. या उद्योगात ज्वलनशील घटकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याने सुरक्षा विषयक सुचनांचे तंतोतंत पालन सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. संबंधीत खात्यांकडून या विषयी सूचना देण्यात येत असल्यातरी त्याचे पालन होत नसल्याचे आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातांमुळे उघड झाले आहे. या उद्योगात लागलेल्या आगीत कोट्यवधीचा कापूस, रूई, सरकी, गाठी, मशनरी तसेच तेल संयत्राचे नुकसान झाले आहे, तर कामगारसुध्दा आगीत होरपळून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी अशा उद्योगात सुरक्षा विषयक सूचनांचे काटेकोर पालन होने आवश्यक आहे. ते हाते वा नाही याची चाचपणी करण्याची सवडही शासकीय यंत्रणांना नाही. यंदा तापमान ४२ डिग्रीपर्यंत गेले असून पारा पुढेही वाढण्याची शक्यता आहे. उष्ण वातावरणात आगीची संभावना अधिक असताना सुरक्षा विषयक सुचनांकडे गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. अनेक घटनामध्ये विजेचे प्रमुख कारण दर्शविण्यात येते. त्यापैकी अनेक घटना संयंत्र चालु बंद करताना होणार्‍या संयंत्राच्या घर्षणातून निघणार्‍या ठिणग्या कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे स्वीच गेटस्मधील जंतुजण्य रूईची साफ सफाई वेळोवेळी आवश्यक आहे. उद्योग व्यवस्थापनाचे दुर्लक्षामुळे लागणार्‍या आगीमुळे होणार्‍या राष्ट्रीय संपत्तीच्या हानीसाठी व मानवी जीवणाच्या होळीसाठी कारणीभूत अशा घटनांची चौकशी व दोषीवर कारवाईची गरज आहे. सदर अपघात विमा रक्कमेसाठी की निष्काळजीपणामुळे याची चौकशी होण्याची गरज आहे.

उद्योगापर्यंत वीज पुरवठा करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असून उद्योगाच्या आतील वीज वाहिनी व सुरक्षित वीज वापराची जबाबदारी उद्योजकांची आहे. या दृष्टीने सुरक्षीतता बाळगली पाहिजे.- मंगेश वैद्यकार्यकारी अभियंता, हिंगणघाट