शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

उद्योगांतील अग्निसुरक्षा यंत्रणा नाममात्रच

By admin | Updated: May 8, 2014 02:06 IST

परिसरात कापूस जंतुजन्य तसेच तेल उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र सुरक्षा विषयक सूचनांना उद्योजक वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याने दरवर्षी आगीमुळे..

भास्कर कलोडे■ हिंगणघाटपरिसरात कापूस जंतुजन्य तसेच तेल उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र सुरक्षा विषयक सूचनांना उद्योजक वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याने दरवर्षी आगीमुळे मनुष्य हानी व कोट्यवधीची वित्त हानी होत आहे. प्रशासकीय यंत्रणांकडून मात्र कारवाई होत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. देवळीतील घटनेने सुरक्षेची बाब पुन्हा ऐरणीवर आली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक तेल व कापूस प्रक्रिया उद्योग हिंगणघाट परिसरात आहे. या उद्योगात ज्वलनशील घटकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याने सुरक्षा विषयक सुचनांचे तंतोतंत पालन सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. संबंधीत खात्यांकडून या विषयी सूचना देण्यात येत असल्यातरी त्याचे पालन होत नसल्याचे आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातांमुळे उघड झाले आहे. या उद्योगात लागलेल्या आगीत कोट्यवधीचा कापूस, रूई, सरकी, गाठी, मशनरी तसेच तेल संयत्राचे नुकसान झाले आहे, तर कामगारसुध्दा आगीत होरपळून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी अशा उद्योगात सुरक्षा विषयक सूचनांचे काटेकोर पालन होने आवश्यक आहे. ते हाते वा नाही याची चाचपणी करण्याची सवडही शासकीय यंत्रणांना नाही. यंदा तापमान ४२ डिग्रीपर्यंत गेले असून पारा पुढेही वाढण्याची शक्यता आहे. उष्ण वातावरणात आगीची संभावना अधिक असताना सुरक्षा विषयक सुचनांकडे गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. अनेक घटनामध्ये विजेचे प्रमुख कारण दर्शविण्यात येते. त्यापैकी अनेक घटना संयंत्र चालु बंद करताना होणार्‍या संयंत्राच्या घर्षणातून निघणार्‍या ठिणग्या कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे स्वीच गेटस्मधील जंतुजण्य रूईची साफ सफाई वेळोवेळी आवश्यक आहे. उद्योग व्यवस्थापनाचे दुर्लक्षामुळे लागणार्‍या आगीमुळे होणार्‍या राष्ट्रीय संपत्तीच्या हानीसाठी व मानवी जीवणाच्या होळीसाठी कारणीभूत अशा घटनांची चौकशी व दोषीवर कारवाईची गरज आहे. सदर अपघात विमा रक्कमेसाठी की निष्काळजीपणामुळे याची चौकशी होण्याची गरज आहे.

उद्योगापर्यंत वीज पुरवठा करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असून उद्योगाच्या आतील वीज वाहिनी व सुरक्षित वीज वापराची जबाबदारी उद्योजकांची आहे. या दृष्टीने सुरक्षीतता बाळगली पाहिजे.- मंगेश वैद्यकार्यकारी अभियंता, हिंगणघाट