शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

उद्योगांतील अग्निसुरक्षा यंत्रणा नाममात्रच

By admin | Updated: May 8, 2014 02:06 IST

परिसरात कापूस जंतुजन्य तसेच तेल उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र सुरक्षा विषयक सूचनांना उद्योजक वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याने दरवर्षी आगीमुळे..

भास्कर कलोडे■ हिंगणघाटपरिसरात कापूस जंतुजन्य तसेच तेल उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र सुरक्षा विषयक सूचनांना उद्योजक वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याने दरवर्षी आगीमुळे मनुष्य हानी व कोट्यवधीची वित्त हानी होत आहे. प्रशासकीय यंत्रणांकडून मात्र कारवाई होत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. देवळीतील घटनेने सुरक्षेची बाब पुन्हा ऐरणीवर आली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक तेल व कापूस प्रक्रिया उद्योग हिंगणघाट परिसरात आहे. या उद्योगात ज्वलनशील घटकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याने सुरक्षा विषयक सुचनांचे तंतोतंत पालन सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. संबंधीत खात्यांकडून या विषयी सूचना देण्यात येत असल्यातरी त्याचे पालन होत नसल्याचे आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातांमुळे उघड झाले आहे. या उद्योगात लागलेल्या आगीत कोट्यवधीचा कापूस, रूई, सरकी, गाठी, मशनरी तसेच तेल संयत्राचे नुकसान झाले आहे, तर कामगारसुध्दा आगीत होरपळून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी अशा उद्योगात सुरक्षा विषयक सूचनांचे काटेकोर पालन होने आवश्यक आहे. ते हाते वा नाही याची चाचपणी करण्याची सवडही शासकीय यंत्रणांना नाही. यंदा तापमान ४२ डिग्रीपर्यंत गेले असून पारा पुढेही वाढण्याची शक्यता आहे. उष्ण वातावरणात आगीची संभावना अधिक असताना सुरक्षा विषयक सुचनांकडे गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. अनेक घटनामध्ये विजेचे प्रमुख कारण दर्शविण्यात येते. त्यापैकी अनेक घटना संयंत्र चालु बंद करताना होणार्‍या संयंत्राच्या घर्षणातून निघणार्‍या ठिणग्या कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे स्वीच गेटस्मधील जंतुजण्य रूईची साफ सफाई वेळोवेळी आवश्यक आहे. उद्योग व्यवस्थापनाचे दुर्लक्षामुळे लागणार्‍या आगीमुळे होणार्‍या राष्ट्रीय संपत्तीच्या हानीसाठी व मानवी जीवणाच्या होळीसाठी कारणीभूत अशा घटनांची चौकशी व दोषीवर कारवाईची गरज आहे. सदर अपघात विमा रक्कमेसाठी की निष्काळजीपणामुळे याची चौकशी होण्याची गरज आहे.

उद्योगापर्यंत वीज पुरवठा करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असून उद्योगाच्या आतील वीज वाहिनी व सुरक्षित वीज वापराची जबाबदारी उद्योजकांची आहे. या दृष्टीने सुरक्षीतता बाळगली पाहिजे.- मंगेश वैद्यकार्यकारी अभियंता, हिंगणघाट