शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

आगीच्या लोळांनी होरपळला जिल्हा

By admin | Updated: May 28, 2017 00:25 IST

यंदाचा उन्हाळा आगीच्या घटनांनी जिल्हा चांगलाच हादरला आहे. शनिवारी जिल्ह्यात घडलेल्या आगीच्या तीन घटनांची होरपळ ....

भिष्णूर, वर्धा व पवनारात नुकसान : ड्रीमलॅन्ड सिटीत स्फोटाचा हादरा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यंदाचा उन्हाळा आगीच्या घटनांनी जिल्हा चांगलाच हादरला आहे. शनिवारी जिल्ह्यात घडलेल्या आगीच्या तीन घटनांची होरपळ अनेकांना चटका देणारी ठरली. आष्टी तालुक्यातील भिष्णूर येथे दुपारी अचानक लागलेल्या आगीत १५ कुटुंब उघड्यावर आले तर वर्धेलगतच्या सावंगी (मेघे) येथील ड्रीमलॅन्ड सिटीच्या सुरक्षा रक्षकाच्या घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला. पवनार येथे लागलेल्या आगीत गोठ्यातील साहित्याची राख झाली. जिल्ह्यात तीनही ठिकाणी लागलेल्या आगीवर ताबा मिळविण्याकरिता नागरिकांनीच पुढाकार घेतल्याचे समोर आले. भिष्णूर येथील स्थिती आटोक्यात आणण्याकरिता अग्निशमन दलासह सिडेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ केली. वर्धेत मात्र अग्निशमन दलाला पोहोचण्यास विलंब झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. आग लागलेले घर एकटे असल्याने त्याचा विशेष विपरित परिणाम झाला नाही. पवनार येथील गोठ्याला आग लागल्याची माहिती मिळताच सेवाग्रामचे ठाणेदार पिदूरकर यांनी घटनास्थळ गाठत वेळीच बैल सोडल्याने त्यांचे प्राण बचावले; पण यात शेतकऱ्याने खरीप हंगामाकरिता आणलेले बियाणे आणि खत जळून खाक झाले.