शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे शेकडो झाड भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:45 IST

सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रत्नापूर चौरस्ता ते अडेगावा ते गिरोली रस्त्याच्या दुतर्फा लावलेली शेकडो झाडे धुऱ्याला लावलेल्या आगीमुळे भस्मसात झाली आहेत. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देशासनाच्या वृक्ष लागवड संकल्पनेला हरताळ : चौकशी करून कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रत्नापूर चौरस्ता ते अडेगावा ते गिरोली रस्त्याच्या दुतर्फा लावलेली शेकडो झाडे धुऱ्याला लावलेल्या आगीमुळे भस्मसात झाली आहेत. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार शासनाच्या वृक्षसंवर्धनाच्या संकल्पनेला हरताळ फासणारा ठरत असल्याने याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींची आहे.रत्नापूर ते गिरोली व परिसरातील इतर ग्रामीण रस्त्यावर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात चार वर्षांपूर्वी शेकडो रोपटे लावण्यात आली. अल्पवधीतच ही रोपटी मोठीही झाली. या कार्यात शासनासोबतच सामाजिक संस्थाचे योगदान घेण्यात आले. लांब उंच वाढलेल्या झाडांमुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर हरितमय झाला असताना धुऱ्यांना लावलेल्या आगीत शेकडो झाडे भस्मसात झाली.परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळवाही व पावसाळ्याच्या आधीची व्यवस्था म्हणून आपल्या धुऱ्यांना आगी लावल्या. ही आग बघता-बघता रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या झाडापर्यंत पोहचली. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ही आग दोन दिवसापर्यंत धुमसत राहिली. संपूर्ण परिसर आगीने कवेत घेतल्याने लाखोंचे नुकसानही झाले आहे.धुऱ्यांना आगी लावणे ही बाब दरवर्षीची असली तरी यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांच्यावतीने या परिसरातील कास्तकारांना तश्या प्रकारच्या सुचना न दिल्यामुळे किंवा सतर्कता न बाळगल्यामुळे सदर आगी लागल्याचे व आगीत शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून लावलेली झाडेही भस्मसात झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे वृक्षलागवडीसाठी शासनाच्यावतीने प्रयत्न होत आहे. चार कोटी वृक्षलागवडीसाठी परिश्रम घेतले जात आहे. जिल्हाधिकारी पासून ते विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यासाठी राबत आहे. परंतु, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेवर पाणी फेरले जात आहे. यापूर्वी तालुक्यात पं. स. स्तरावर सर्व ग्रा.पं.ना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावर चार ते पाच कोटींचा खर्च करण्यात आला. शासनाचा या योजनेवर हा सर्व खर्च होवून सुद्धा ही वृक्षलागवड कागदावर ठरली होती. कोटींचा निधी खर्च झालेली वृक्ष जळाल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मारोती लोहवे यांनी केली आहे.खर्च झालेला शासकीय निधी गेला वायापंचायत समिती स्तरावरून आदेश निर्गमित करीत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्या आदेशाची अंमलबजावणीही बहुतांश गावात झाली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय निधीही खर्च करण्यात आला. परंतु, जी रोपटी अल्पावधीतच मोठी झाली तिच धुºयाला लावलेल्या आगीत भस्मसात झाल्याने शासनाचा निधीही वाया गेल्याचे म्हटले जात आहे.