शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ग्रामीण भागात पेट्रोल पंपांचे फायर आॅडिट रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:58 IST

सूर्याची दाहकता अद्याप कमी झाली नसून पारा ४५ अंश सेल्सीअसवर स्थिरावला आहे. उष्णतेची स्थिती ज्वलनशील पदार्थासाठी धोकादायक असतानाही ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांचे ‘फायर आॅडीट’ रखडलेले आहे.

ठळक मुद्देसुरक्षा धोक्यात : तपासणीची जबाबदारी पुरवठा अधिकाऱ्यांवर

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सूर्याची दाहकता अद्याप कमी झाली नसून पारा ४५ अंश सेल्सीअसवर स्थिरावला आहे. उष्णतेची स्थिती ज्वलनशील पदार्थासाठी धोकादायक असतानाही ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांचे ‘फायर आॅडीट’ रखडलेले आहे. बहुतांश पेट्रोल पंपांवरील अग्निशामन यंत्रे कालबाह्य तथा निकामी असून आग लागल्यास ती नियंत्रणात आणणे अशक्य होईल, असे चित्र दिसत आहे.पेट्रोलपंपांवर ग्राहकांना आवश्यक सुविधा पडताळणीची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाºयांची आहे. ग्रामीण भागात काही मोजक्याच पेट्रोलपंपांवर या सुविधा आहेत. पंप हे नियमानुसार सुरू आहेत अथवा नाही, ही खबरदारी घेण्यासाठी पेट्रोलीयम कंपन्यानीही आकस्मिक भेट देऊन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सुविधांची तपासणी करणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही अग्निशामक यंत्राची दुरूस्ती व बदलण्याची जबाबदारी पेट्रोलपंप मालकांनी घेतली नाही.आग लागल्यास ती रोखण्यासाठी वा विझविण्यासाठी पेट्रोल पंपांवर असलेले ‘एक्स्टिंग्युशर’ हे कालबाह्य आहेत. या अग्निशामक यंत्रातील गॅस अथवा ड्राय केमिकल मुदतीत बदलविण्यात आलेले नाही. काही पंपांवर आहे की नाही, हे सुद्धा माहिती नाही. पेट्रोल पंपांवर स्वतंत्र ५ ते १० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असणे आवश्यक आहे; पण तेही दिसून येत नाही. पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आग विझविण्यासठी लोखंडी बादल्यामध्ये वाळू (रेती) भरून ठेवली जाते; पण काही पेट्रोलपंपांवर त्या बकेटही नाही तर काही पेट्रोल पंपांवर बकेटमधील रेतीची माती झालेली आहे.पेट्रोलपंप मालक हे केवळ व्यावसायिक हित जपत असून त्यांनी ग्राहकांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे काढले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असून पेट्रोलपंपांवर अप्रिय घटना घडल्यास कोण जबाबदारी स्वीकारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूण वर्धा तालुक्यातील पंपांवर सुरक्षा रामभरोसे दिसत आहे.पेट्रोल चोरीलाही उधाणकाही पेट्रोल पंपांवर पेट्रोल चोरीची घटना उघडकीस येत असतात. काही पेट्रोल पंपांवर पाईपद्वारे पेट्रोलऐवजी हवाही आकली जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. यात पेट्रोल पंपांवरील पेट्रोल भरणारा पाईप काळ्या रंगाचा असतो. त्या ऐवजी पाईप हा पांढरा म्हणजे पारदर्शक पाईप लावल्यास पेट्रोल टाकीत जाताना दिसेल. यावरून पेट्रोल भरताना नागरिकांनाही आपल्या गाडीमध्ये किती पेट्रोल पडते, याचा अंदाज येऊ शकेल. याद्वारे पेट्रोल चोरीला आळा बसू शकेल.

टॅग्स :Petrolपेट्रोल