शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

कामांना वित्तीय ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

वित्त विभागाने २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पीय निधीच्या फक्त ३३ टक्केच निधी उपलब्ध होईल. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय कामांची माहिती मागविण्यात आली होती.

ठळक मुद्देशासनाचा आदेश : इमारत, रस्ते बांधकामांना लागलाय ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या वित्तीय वर्षामध्ये महसुलाची घट आणि अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेऊन वित्त विभागाने सुरु असलेली कामे सुरक्षित अवस्थेत आणण्यापर्यंतचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वित्तीय ग्रहणामुळे आता जिल्ह्यातील विविध विकास कामांना ब्रेक लागणार आहेत.वित्त विभागाने २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पीय निधीच्या फक्त ३३ टक्केच निधी उपलब्ध होईल. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय कामांची माहिती मागविण्यात आली होती. प्राप्त झालेल्या माहितीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता ४०५९ व ४२१६ लेखाशिर्षांतर्गत ३३ टक्के निधीची उपलब्धता लक्षात घेवून निरीक्षण बंगले, कोषागारे व राजभवन, प्रशासकीय इमारती व निवासी इमारती आदींचे सुरक्षित अवस्थेत आणण्यापर्यंतचे बांधकाम करण्या संदर्भात नियोजन करावे. तसेच प्रशासकीय इमारतींवर झालेला खर्च शासनास कळवावा, जेणे करुन पुढील बांधकामाबाबत आवश्यकतेनुसार नियोजन करण्यात येईल.कामानिहाय खर्च कळवून किमान सुरु ठेवण्यासाठीचे प्राधान्यक्रमाने नियोजन करुन शासनास कळवावे व शासनाच्या पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील बांधकामाबाबत कार्यवाही करावी. तसेच मिळणाऱ्या निधीतून सर्व प्रथम सर्व लेखाशिर्षाखालील सर्व प्रलंबित देयके प्रदान करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार वर्ध्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही सुरु करण्यात आल्याने आता वर्ध्यातील विकास कामे सुरक्षित अवस्थेत येवून थांबणार आहेत.मात्र, यानंतर कधी निधी प्राप्त होईल आणि कधी या रखडलेल्या कामांना गती मिळेल हे आता येणारी वेळच सांगणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाची ‘युनिक’ इमारत रखडलीस्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक वास्तू पाडून त्या ठिकाणी नियोजनभवन व जिल्हाधिकारी कार्यालयाची पर्यावरणपूरक इमारतीचे २०१९ मध्ये बांधकाम सुरु करण्यात आले. २० कोटीच्या या इमारतीवर आतापर्यंत १० कोटी खर्च करण्यात आले आहे. आता मजूर नाही व निधीही नसल्याने या इमारतीचे बांधकाम रखडले आहे.अत्यावश्यक असलेला बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या बांधकामालाही अडचणी निर्माण झाल्या आहे. निधीअभावी काम थांबणार आहे.दीर्घ कालावधीनंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाला गती मिळाली होती पण, त्यालाही ब्रेक लागला आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम व रस्त्यांची कामे सुरक्षित अवस्थेत आणून थांबवावी लागणार आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु केली असून याचा जिल्ह्यातील विकास कामांवर फारसा परिणाम पडणार नाहीत.- गजानन टाके, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग