शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

अखेर कारंजा व आष्टीवरील अन्याय दूर

By admin | Updated: December 31, 2014 23:28 IST

जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ३६ गावांसह आष्टी व कारंजा तालुक्यातील २९२ गावांना दुष्काळी स्थितीतून वगळण्यात आले होते, याबाबत ‘लोकमत’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर

लोकमतची दखल : अंतिम पैसेवारीत होणार वास्तव नोंदवर्धा : जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील ३६ गावांसह आष्टी व कारंजा तालुक्यातील २९२ गावांना दुष्काळी स्थितीतून वगळण्यात आले होते, याबाबत ‘लोकमत’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या गावांची पैसेवारी ५० पेक्षा आत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली आहे. अंतिम पैसेवारी जाहीर करताना ही गावे दुष्काळी स्थितीत मोडणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील १३८७ गावे खरीप हंगाम पिकाखाली आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र १३४१ पैकी १०४९ गावांचीच खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा आत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता. तर उर्वरित २९२ गावांची पैसेवारी मात्र ५० पैशापेक्षा अधिक असल्याचे दर्शविण्यात आले होते. यामध्ये आष्टी व कारंजा तालुक्यासह आर्वी तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. परिणामी या गावातील शेतकऱ्यांची या दुष्काळी स्थितीशी झुंज सुरू असतानाही त्यांच्यावर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याचे सुल्तानी संकट निर्माण झाले होते. हे विदारक वास्तव ‘लोकमत’ने जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देताच एकच खळबळ उडाली. यानंतर यंत्रणा कामाला लागली. अखेर सदर गावांतील वस्तुस्थिती लक्षात घेऊन या गावांची पैसेवारी ५० पेक्षा आत असल्याची बाब पुढे आली. यानुसार अंतिम पैसेवारी जाहीर करताना या गावांवर अन्याय होणार नाही. याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीतून यंत्रणेला दिल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)