शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चौकशी समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:33 IST

पशुसंवर्धनच्या शिपायाने खोटी बतावणूक करून १४ शेतकऱ्यांना २२ लाखांनी गंडा घातल्या प्रकरणी अखेर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालदील शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २१ एप्रिलला वृत्त प्रकाशित करून सदर प्रकरणावरील पडदा लोकमतने उचलला होता.

ठळक मुद्दे१४ शेतकऱ्यांची २२ लाखांनी फसवणूक केल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : पशुसंवर्धनच्या शिपायाने खोटी बतावणूक करून १४ शेतकऱ्यांना २२ लाखांनी गंडा घातल्या प्रकरणी अखेर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालदील शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २१ एप्रिलला वृत्त प्रकाशित करून सदर प्रकरणावरील पडदा लोकमतने उचलला होता. याच वृत्ताची दखल घेत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी ही चौकशी समिती गठीत केली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषीवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.७५ टक्के अनुदानावर गाय, म्हशी देण्याची योजना सन २०१८-१९ पासून आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. मात्र, निलंबीत शिपाई गुरनुले याने आष्टी तालुक्यातील १४ शेतकऱ्यांना तब्बल २२ लाखाचा गंडा घातला. याची दखल घेत शिवसेना आर्वी विधानसभा प्रमुख बाळा जगताप यांनी शेतकऱ्यांना घेवून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच दरम्यान लोकमतने वृत्त प्रकाशीत करताच पशुसंवर्धन विभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तातडीने २२ एप्रिलला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाºयांनी चौकशी समिती गठीत केली.यामध्ये जे.एल. वसावे उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली. सोबतच पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. व्ही. वंजारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी हेमंत भोयर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नंदू बोबडे यांचा समावेश आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच सदर शिपायाला बडतर्फ करीत त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.गुरनुलेविरुद्ध यापूर्वीही ४२० चा गुन्हापशुसंवर्धनचा कर्मचारी नंदकिशोर गुरनुले हा पशुवैद्यकीय दवाखाना पार्डी ता. कारंजा येथे कार्यरत होता. त्याने आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकऱ्याची फसवणूक केली. त्यावेळी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्याचा अहवाल १५ जून २०१८ ला प्राप्त झाल्यावर तात्काळ निलंबन करून सेलू येथे बदली झाली होती. त्याच्यावर ९ जुलै २०१८ ला तळेगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.चौकशी समिती गठित करण्यात आली असून अहवाल प्राप्त होताच योग्य कारवाई होईल; पण शेतकºयांनी आता जाणून घेतले पाहिजे की कुठल्याही प्रकारच्या योजना आॅफलाईन नाहीत. शासनाने सर्व योजना आॅनलाईन सुरू केल्या आहे. शेतकºयांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये प्रत्यक्ष जावूनच अर्ज सादर करावा. त्यानंतर सदरचा अर्ज पं.स.स्तरावरील पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचे शिफारशीने कार्यालयात प्राप्त होतो. योजनानिहाय लाभार्थी निवड समितीद्वारे करून त्याची यादी पुन्हा पं. स. स्तरावर पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येते. गुरनुले यांनी आणखी काहींची फसगत केली असेल तर त्यांनी लेखी तक्रार पशुसंवर्धन विभाग जि.प. वर्धा येथे सादर करावी.- डॉ. प्रज्ञा गुल्हाणे, पशुसंवर्धन अधिकार, जि.प. वर्धा.पशुसंवर्धनचा शिपाई नंदकिशोर गुरनुले याने केलेल्या ठगबाजी प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यासाठी चौकशी समिती गठित केली आहे. याच चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. शिवाय वेळप्रसंगी दोषी शिपायावर फौजदारी कारवाईही करण्यात येईल.- डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प. वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीfraudधोकेबाजी