शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अध्यक्ष सचिवांची निवड

By admin | Updated: February 15, 2015 01:42 IST

पाणी पुरवठा स्वच्छता सिमतीच्या अध्यक्षाच्या निवडीवरून दोन वेळा ग्रामसभा तहकूब झाली होती. या समितीच्या अध्यक्ष व सचिपदाची निवड झाल्याने अखेर हा वाद निवळला.

नाचणगाव : पाणी पुरवठा स्वच्छता सिमतीच्या अध्यक्षाच्या निवडीवरून दोन वेळा ग्रामसभा तहकूब झाली होती. या समितीच्या अध्यक्ष व सचिपदाची निवड झाल्याने अखेर हा वाद निवळला. समितीच्या अध्यक्षपदी पुष्पा खडसे तर सचिवपदी दीपक आंबेकर यांची निवड झाली. मागील आठवड्यात तहकुब झालेली ग्रामसभा शुक्रवारी भीमोदय वाचनालयाच्या समोरील आवारात झाली. सभेच्या अध्यक्षपदाकरिता वैशाली घोडेस्वार व उषा पाटील यांची नावे आली. यावेळी वैशाली घोडेस्वार यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षाने ग्रामसभेला सुरुवात केली. यावेळी दोन विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस ताका, व्हिडीओ चित्रिकरण अशा मोठ्या नियोजनात सभेला सुरुवात झाली. अध्यक्ष निवडीचा वाद सुटता सुटेना. अशात ग्रामविकास अधिकाऱ्याने केलेल्या आक्षेपाह विधानाने आणखीच गोंधळ उडाला. ग्रामविकास अधिकारी बोबडे यांनी उपस्थित ग्रामस्थांची माफी मागितल्याने वाद निवळला. अध्यक्षाची निवड ईश्वरचिट्ठीने करावी की मतदानाने यावर तोडगा निघत नव्हता. अखेर निवडणुकीद्वारे हात उंचावून मतदान घेवून अध्यक्षस्थाची निवड करण्यात आली. पुष्पा खडसे व प्रवेश चिनेवार यांच्यात झालेल्या निवडणुकीत पुष्पा खडसे विजयी झाल्या. सचिवच्या निवडणुकीत प्रविण घोडेस्वार यांचा पराभव करत दीपक आंबेडकर विजयी झाले. (वार्ताहर) उन्हात ताटकळत नागरिक उभेग्रामसभा ही खुल्या आवारात घेतल्याने नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला. सभा बराच वेळ सुरू असल्याने नागरिकांत ताटकळत रहावे लागले. काहिंनी लगतच्या वडाच्या झाडाचा तसेच तेथील ओट्याचा बसण्यासाठी आसरा घेतला. दोन सभा सभागृहात तर एक मोकळ्या आवारात यामुळे नागरिकांत नाराजीचा सुरू होता. अध्यक्षांनी निर्णय राखून ठेवलापाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर निवडणुकीचा निर्णय ग्रामसभा अध्यक्ष वैशाली घोडेस्वार यांनी राखुन ठेवला. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबविण्यात आल्याची हमी ग्रामपंचायत नाचणगावचे ग्रामविकास अधिकारी बोबडे यांनी दिली. तसेच प्रक्रिया ही पंचायत समितीच्या दोन विस्तार अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली होती असे सांगण्यात आले. तेव्हा दोन्ही पक्षांचा कल लक्षात घेता अखेर ग्रामसभा अध्यक्षांनी पुष्पा खडसे विजयी झाल्याची घोषणा केली.