शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

अखेर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांमध्ये संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. अखेर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शासनाच्या निर्देशानुसार आजपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी  जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या १ हजार १५९ शाळा सुरू झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसरामध्ये उत्साह संचारला होता.शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. अखेर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यानुसार पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ९७१ तर शहरी भागातील १८८ पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात. यात ग्रामीण भागात २४ हजार ४१२ तर शहरी भागात १२ हजार ८०६ विद्यार्थी उपस्थित झाले होते. त्यामुळे तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शाळांनी व्यवस्था केली आहे. त्यासोबतच आज पहिल्या दिवशी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत केले.

तीन दिवसात अहवाल सादर कराशासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांनुसार शाळा सुरु करण्यासंदर्भातील पूर्व तयारीबाबत पडताळणी करुन खात्री करण्याचे निर्देष जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार प्राथमिकचे शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवणे यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व समग्र शिक्षा अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांनी गटातील सर्व शाळांची पडताळणी करण्याचे नियोजन करुन १०० टक्के शाळांच्या पडताळणीसोबतच सर्व शाळांचा अहवाल प्रपत्रानुसार संकलित करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या