शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

अखेर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांमध्ये संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. अखेर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शासनाच्या निर्देशानुसार आजपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी  जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या १ हजार १५९ शाळा सुरू झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसरामध्ये उत्साह संचारला होता.शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. अखेर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यानुसार पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ९७१ तर शहरी भागातील १८८ पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात. यात ग्रामीण भागात २४ हजार ४१२ तर शहरी भागात १२ हजार ८०६ विद्यार्थी उपस्थित झाले होते. त्यामुळे तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शाळांनी व्यवस्था केली आहे. त्यासोबतच आज पहिल्या दिवशी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत केले.

तीन दिवसात अहवाल सादर कराशासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांनुसार शाळा सुरु करण्यासंदर्भातील पूर्व तयारीबाबत पडताळणी करुन खात्री करण्याचे निर्देष जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार प्राथमिकचे शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवणे यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व समग्र शिक्षा अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांनी गटातील सर्व शाळांची पडताळणी करण्याचे नियोजन करुन १०० टक्के शाळांच्या पडताळणीसोबतच सर्व शाळांचा अहवाल प्रपत्रानुसार संकलित करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या