शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:27 IST

उन्हाची तमा न बाळगता बळीराजा राबतच असतो, नांगरणी, वखरणी, रोटावेटर, करून धुऱ्यांची साफसफाई सह शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते. व धुळपेरणी तथा खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांची शेत सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देसिंचन सोय असणाऱ्यांनी केली कपाशीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : उन्हाची तमा न बाळगता बळीराजा राबतच असतो, नांगरणी, वखरणी, रोटावेटर, करून धुऱ्यांची साफसफाई सह शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते. व धुळपेरणी तथा खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांची शेत सज्ज झाली आहे.दोन तीन वर्षापासून कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळी आक्रमण करीत असल्याने कापूस उत्पादनात घट आल्याचे दिसून येते. तरीपण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे म्हणून धुळपेरणीच्या तयारीत असल्याचे दिसून येते. मृग नक्षत्र केवळ दोन दिवसावर आल्यामुळे शेतकरी कपाशी लागवडीकरिता धावपळ करीत असल्याचे चिकणी व परिसरामध्ये दिसून येते.चिकणी शिवारात ओलिताखाली असलेल्या शेतात काही शेतकऱ्यांना कपाशीची लागवड करण्याकरिता शेतात स्प्रिंकलरद्वारे सिंचन सुरू केले आहेत. शेताचे सिंचन केल्यानंतर कपाशीची लागवड करण्यात येणार असल्याचे शेतकरी सांगतात.कोरडवाहू शेतकऱ्यांनी लागवड करू नयेकोरडवाहू शेतकऱ्यांची विशेष धावपळ दिसत नाही, कारण हवामान खात्याचा अंदाजानुसार जिल्ह्यात मान्सून उशिराच दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहेत. यावर्षी मात्र कोरडवाहू शेतकरी मान्सून आल्याशिवाय कपाशीची लागवड करणार नसल्याचेच चित्र दिसून येते. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घाई करू नये असे कृषी विभागाने सांगितले आहे. पाऊस लांबल्यास धुळपेरणी केलेल्या शेतकऱ्यासमोर संकट निर्माण होऊ शकते अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे.मान्सूनचा पाणी आल्याशिवाय यावर्षी कपाशीची लागवड करणे धोक्याचेच ठरेल. बियाणे सुद्धा महागले आहेत. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच कपाशी लागवड केल्या जाईल.अतुल देशमुख, शेतकरी, चिकणी

टॅग्स :agricultureशेती