शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पाण्याअभावी ‘रोपटे’ मोजत आहेत शेवटची घटिका

By admin | Updated: February 17, 2017 02:16 IST

शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकात स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने

पाण्याअभावी ‘रोपटे’ मोजत आहेत शेवटची घटिकापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज : मुख्य मार्गावरील प्रकारवर्धा : शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकात स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ओळखून ठिकठिकाणी विविध प्रकारचे रोपटे लावले. परंतु, सध्या हे रोपटे पाण्याअभावी शेवटची घटीका मोजत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याकडे पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.समाजातील सर्व स्तरातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी कार्य केले जात असून शासनाच्यावतीनेही विविध योजना राबविल्या जात आहेत. शासनाच्या वृक्षसंवर्धनाच्या योजनेचा एक भाग म्हणून स्थानिक नगर पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या सुरूवातीला वर्धा शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक परिसरातील रस्ता दुभाजकात वृक्ष लावले. पावसाळ्यात त्या वृक्षांना पावसाच्या सरींनी आधार मिळाल्याने ते रोपटे जानेवारी अखेरपर्यंत हिरवेकंच होते. परंतु, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उकाडा वाढल्याने व तापमानात वाढ झाल्याने सध्या या रोपट्यांनी पाण्याअभावी माना टाकल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरातील मुख्य मार्ग परिसरात रस्ता दुभाजकात लावण्यात आलेले विविध प्रजातीची रोपटे जगविण्याकडे संबंधीतांचे सध्या दुर्लक्ष होत असल्याने वृक्षसंवर्धनाच्या उद्देशालाच फाटा मिळत आहे. सदर प्रकार गंभीर असल्याने याकडे पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची शहरातील वृक्षप्रेमींसह नागरिकांची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)