शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाण्याअभावी ‘रोपटे’ मोजत आहेत शेवटची घटिका

By admin | Updated: February 17, 2017 02:16 IST

शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकात स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने

पाण्याअभावी ‘रोपटे’ मोजत आहेत शेवटची घटिकापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज : मुख्य मार्गावरील प्रकारवर्धा : शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकात स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ओळखून ठिकठिकाणी विविध प्रकारचे रोपटे लावले. परंतु, सध्या हे रोपटे पाण्याअभावी शेवटची घटीका मोजत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याकडे पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.समाजातील सर्व स्तरातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी कार्य केले जात असून शासनाच्यावतीनेही विविध योजना राबविल्या जात आहेत. शासनाच्या वृक्षसंवर्धनाच्या योजनेचा एक भाग म्हणून स्थानिक नगर पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या सुरूवातीला वर्धा शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक परिसरातील रस्ता दुभाजकात वृक्ष लावले. पावसाळ्यात त्या वृक्षांना पावसाच्या सरींनी आधार मिळाल्याने ते रोपटे जानेवारी अखेरपर्यंत हिरवेकंच होते. परंतु, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उकाडा वाढल्याने व तापमानात वाढ झाल्याने सध्या या रोपट्यांनी पाण्याअभावी माना टाकल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरातील मुख्य मार्ग परिसरात रस्ता दुभाजकात लावण्यात आलेले विविध प्रजातीची रोपटे जगविण्याकडे संबंधीतांचे सध्या दुर्लक्ष होत असल्याने वृक्षसंवर्धनाच्या उद्देशालाच फाटा मिळत आहे. सदर प्रकार गंभीर असल्याने याकडे पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची शहरातील वृक्षप्रेमींसह नागरिकांची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)