शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

दिग्गजांच्या लढतीत ‘कही खुशी, कही गम’

By admin | Updated: February 24, 2017 02:12 IST

निवडणुकीत सावंगी(मेघे) गटातून भाजपाचे दिग्गज उमेदवार जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, शेकापूर(बाई) गटातून

भाजपलाच कौल : काँगे्रसच्या मोेठ्या नावांचा पराभववर्धा : निवडणुकीत सावंगी(मेघे) गटातून भाजपाचे दिग्गज उमेदवार जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, शेकापूर(बाई) गटातून शिक्षण व आरोग्य समिती सभापती वसंत आंबटकर, वायगाव(नि.) गटातून माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, भिडी गटातून काँग्रेसचे उमेदवार व आ. रणजित कांबळे यांचे कट्टर समर्थक मनोज वसु, ंिहगणी गटातून माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, झडशी गटातून भाजपाचे वरुण दफ्तरी, पोहणा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांना पराभवाचे तोंड पहावे लागले, तर हिंगणी गटातून भाजपाचे दिग्गज उमेदवार राणा रणनवरे यांनी काँग्रेसचे माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव करुन विजय संपादन केला. तरोडा गटातून काँग्रेसचे वर्धा बाजार समिती उपसभापती पांडुरंग देशमुख यांची पत्नी उज्वला देशमुख, तर अल्लीपूर गटातून माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांच्या पत्नी विभा ढगे विजयी झाल्या. अंदोरी गटातून माजी जि.प. उपाध्यक्ष राकाँचे संजय कामनापुरे हे दुसऱ्यांदा विजयी झाले. हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर बाई गटातील कुटकी गणातून भाजपचे उमेदवार प्रफुल्ल बाडे यांच्यावर काँग्रेसचे आशिष पोपटकर यांनी एका मताने विजय संपादन केला, तर सेलू तालुक्यातील झडशी गटातील रिधोरा गणातून भाजप उमेदवार योगेश रणनवरे ईश्वर चिठ्ठीने विजयी झाला. आठही तालुक्याच्या मुख्यालयी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीपर्यंत अनेकांनी आपापल्या परीने अंदाज वर्तविताना या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष असणार, मात्र सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार असे बोलले जात होते. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपाने एकहाती सत्ता हस्तगत करुन जिल्हा भाजपमय केला. या निवडणुकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार हे भाजपाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. ही निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची झाली होती. काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, आ. रणजित कांबळे, आ. अमर काळे, वर्धेचे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आ. सुरेश देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु भाजपची लाट थोपविण्यात ही मंडळी अपयशी ठरली. शिवसेनेने गिरड व जाम गटात अनपेक्षित यश मिळवून आश्चर्याचा धक्का दिल्याने शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांची बाजू राखली. बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी सावंगी(मेघे) गटात भाजपचे उमेदवार विलास कांबळे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास दोड यांच्यातील शत्रुत्वाचा अचुक राजकीय फायदा घेत येथे विजय संपादन केला, तसेच सिंदी(मेघे) गटातही भाजपात उमेदवारी वाटपावरुन झालेल्या भांडणाचा बसपाने नियोजनबद्धरित्या फायदा घेत आपला उमेदवार निवडून आणला. पंचायत समितीतही भाजपाची सरशीअशीच अवस्था पंचायत समितीची राहिली आहे. आठही पंचायम समितीत १०४ पैकी तब्बल ५८ जागा भाजपाने बळकाविल्या आहेत. काँग्रेसला ३१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. येथे काँगे्रसही वाढली आहे. २०१२ मध्ये आठही पंचायत समितीत काँग्रेसला २८ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच फटका सहन करावा लागल. या निवडणुकीत राकॉला ५ केवळ जागा मिळाल्या. २०१२ च्या निवडणुकीत राकाँला २२ जागा होत्या. या व्यतिरिक्त शिवसेना १, स्वभाप १, बसपा २ आणि ६ जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)