शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:10 IST

कामगारांच्या विविध मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ लढा तीव्र करणे गरजेचे आहे, ...

श्याम काळे : आयटकचे जिल्हास्तरीय अधिवेशन लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कामगारांच्या विविध मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ लढा तीव्र करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे यांनी केले. ते स्थानिक बच्छराज धर्मशाळेत आयोजित जिल्हास्तरीय अधिवेशनात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी राज्य सचिव दिलीप उटाणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.काळे पुढे म्हणाले, कामगारांच्या हिताचे कायद्यात शासन बदल करीत आहे. ज्या पदावर नियमित कर्मचारी पाहिजे तेथे कंत्राटी असे अनेक सरकारी विभाग आहेत. ज्या ठिकाणी दहा ते पंधरा वर्ष होवून गेले. पण, त्यांना नियमित कराण्यात आलेले नाही. त्यांचे शोषण केले जात आहे. रोजगार राहील कि नाही सांगता येत नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियान असे विविध विभाग आहेत. निवडणूक आली कि राजकीय पक्षाला कामगारांची आठवण येते. पब्लिक प्रायव्हेट पॉपर्टी पार्टनरशिपच्या नावाखाली सार्वजनिक क्षेत्र खासगी संस्थांना विकले जात आहेत. पुढे मुलांना नोकऱ्या कशा मिळतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यातील कामगारांना ठेवायचे की नाही यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागत होती. परंतु, आता ते अधिकार कारखाना मालकांना देण्यात आले आहे. यावरून हे सरकार कुणाचे सहज स्पष्ट होते. कामगारांना त्यांच्या मुलभुत अधिकारांपासून दूर ठेवण्याचा डाव आयटक खपवून घेणार नाही. यासाठी सर्व स्तरावरील कामगार संघटनानी एकत्र येवून लढा द्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.दिलीप उटाणे यांनी ३१ आँक्टोबर १९२० आयटकची स्थापना झाली. देशातील पहिली कामगार संघटना म्हणून तिला संबोधिले जाते. अंगणवाडी कर्मचारी, आशा गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी रेटल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनोहर पचारे, विजया पावडे, सुजाता भगत, राजेश इंगोले, गुणवंत डकरे, सिध्दार्थ तेलतुंबडे आदींची उपस्थिती होती.