शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू प्रादुर्भावाचा आलेख वाढताच पाच वर्षांत घेतला पंधरांचा ‘बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. डासांच्या या प्रजाती चिकुनगुनिया, यलो फिव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कीटकजन्य आजार अशी डेंग्यूची ओळख. पण सध्या याच आजाराच्या प्रादुर्भावाचा आलेख जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मागील काही वर्षांपासून वाढतच असल्याचे वास्तव आहे. माॅन्सूनने हजेरी लावल्यावर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत वाढ होत असून, हेच साचणारे स्वच्छ पाणी डेंग्यूचा प्रादुर्भावाला खतपाणी देण्यासाठी पोषक ठरत असल्याने नागरिकांनीही पावसाळ्याच्या दिवसांत दक्ष राहून खबरदारीच्या विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

‘ड्राय-डे’च ठरतो उपयुक्त   -  डेंग्यू हा कीटकजन्य आजार विषाणूजन्य रोग आहे. एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून त्याचा झपाट्याने प्रसार होतो. या आजाराला ब्रेक लावण्यासाठी विशेष करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचेच ठरत असल्याचे सांगण्यात आले.

असा होतो प्रसार

कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. डासांच्या या प्रजाती चिकुनगुनिया, यलो फिव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.

शहरी भागात घेतले सर्वाधिक बळी-  मागील पाच वर्षांत जिल्ह्यात डेंग्यूमुळे तब्बल १५ व्यक्तींचा मृत्यू झाला. यात शहरी भागातील आठ, तर ग्रामीण भागातील सात रहिवाशांचा समावेश आहे.

डासाच्या शरीरात पुनरुत्पादन  संसर्ग झालेल्या व्यक्तीने प्रवास केल्यास त्यांच्यासोबत डेंग्यूचे विषाणू नव्या प्रदेशात जातात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावून ते दुसऱ्या व्यक्तींना चावल्यास विषाणूचा संसर्ग होतो. कारण विषाणूंचे डासाच्या शरीरात पुनरुत्पादन होत असल्याचे सांगण्यात आले.

डेंग्यू हा कीटकजन्य आजार आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. परिणामी, याच दिवसांत डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक वाढतो. त्यामुळे या दिवसांत नागरिकांनी अधिक दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन केले पाहिजे.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :dengueडेंग्यू