शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

डेंग्यू प्रादुर्भावाचा आलेख वाढताच पाच वर्षांत घेतला पंधरांचा ‘बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. डासांच्या या प्रजाती चिकुनगुनिया, यलो फिव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कीटकजन्य आजार अशी डेंग्यूची ओळख. पण सध्या याच आजाराच्या प्रादुर्भावाचा आलेख जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मागील काही वर्षांपासून वाढतच असल्याचे वास्तव आहे. माॅन्सूनने हजेरी लावल्यावर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत वाढ होत असून, हेच साचणारे स्वच्छ पाणी डेंग्यूचा प्रादुर्भावाला खतपाणी देण्यासाठी पोषक ठरत असल्याने नागरिकांनीही पावसाळ्याच्या दिवसांत दक्ष राहून खबरदारीच्या विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

‘ड्राय-डे’च ठरतो उपयुक्त   -  डेंग्यू हा कीटकजन्य आजार विषाणूजन्य रोग आहे. एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून त्याचा झपाट्याने प्रसार होतो. या आजाराला ब्रेक लावण्यासाठी विशेष करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचेच ठरत असल्याचे सांगण्यात आले.

असा होतो प्रसार

कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. डासांच्या या प्रजाती चिकुनगुनिया, यलो फिव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.

शहरी भागात घेतले सर्वाधिक बळी-  मागील पाच वर्षांत जिल्ह्यात डेंग्यूमुळे तब्बल १५ व्यक्तींचा मृत्यू झाला. यात शहरी भागातील आठ, तर ग्रामीण भागातील सात रहिवाशांचा समावेश आहे.

डासाच्या शरीरात पुनरुत्पादन  संसर्ग झालेल्या व्यक्तीने प्रवास केल्यास त्यांच्यासोबत डेंग्यूचे विषाणू नव्या प्रदेशात जातात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावून ते दुसऱ्या व्यक्तींना चावल्यास विषाणूचा संसर्ग होतो. कारण विषाणूंचे डासाच्या शरीरात पुनरुत्पादन होत असल्याचे सांगण्यात आले.

डेंग्यू हा कीटकजन्य आजार आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. परिणामी, याच दिवसांत डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक वाढतो. त्यामुळे या दिवसांत नागरिकांनी अधिक दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन केले पाहिजे.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :dengueडेंग्यू