शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

डेंग्यू प्रादुर्भावाचा आलेख वाढताच पाच वर्षांत घेतला पंधरांचा ‘बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. डासांच्या या प्रजाती चिकुनगुनिया, यलो फिव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कीटकजन्य आजार अशी डेंग्यूची ओळख. पण सध्या याच आजाराच्या प्रादुर्भावाचा आलेख जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मागील काही वर्षांपासून वाढतच असल्याचे वास्तव आहे. माॅन्सूनने हजेरी लावल्यावर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत वाढ होत असून, हेच साचणारे स्वच्छ पाणी डेंग्यूचा प्रादुर्भावाला खतपाणी देण्यासाठी पोषक ठरत असल्याने नागरिकांनीही पावसाळ्याच्या दिवसांत दक्ष राहून खबरदारीच्या विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

‘ड्राय-डे’च ठरतो उपयुक्त   -  डेंग्यू हा कीटकजन्य आजार विषाणूजन्य रोग आहे. एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून त्याचा झपाट्याने प्रसार होतो. या आजाराला ब्रेक लावण्यासाठी विशेष करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचेच ठरत असल्याचे सांगण्यात आले.

असा होतो प्रसार

कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. डासांच्या या प्रजाती चिकुनगुनिया, यलो फिव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.

शहरी भागात घेतले सर्वाधिक बळी-  मागील पाच वर्षांत जिल्ह्यात डेंग्यूमुळे तब्बल १५ व्यक्तींचा मृत्यू झाला. यात शहरी भागातील आठ, तर ग्रामीण भागातील सात रहिवाशांचा समावेश आहे.

डासाच्या शरीरात पुनरुत्पादन  संसर्ग झालेल्या व्यक्तीने प्रवास केल्यास त्यांच्यासोबत डेंग्यूचे विषाणू नव्या प्रदेशात जातात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावून ते दुसऱ्या व्यक्तींना चावल्यास विषाणूचा संसर्ग होतो. कारण विषाणूंचे डासाच्या शरीरात पुनरुत्पादन होत असल्याचे सांगण्यात आले.

डेंग्यू हा कीटकजन्य आजार आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. परिणामी, याच दिवसांत डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक वाढतो. त्यामुळे या दिवसांत नागरिकांनी अधिक दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन केले पाहिजे.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :dengueडेंग्यू