शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

भरधाव रेल्वेतून दोघांनी घेतल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:29 IST

अकोला येथून वर्धेला येताना दोन प्रवाशी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले. या रेल्वेला वर्धेत थांबा नसल्याने त्यांनी वर्धा स्थानक येताच गाडीची गती कमी होताच थेट रेल्वे फलाटावर उड्या मारल्या. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देवर्धा रेल्वे स्थानकावरील घटना : दोघांवरही उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अकोला येथून वर्धेला येताना दोन प्रवाशी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले. या रेल्वेला वर्धेत थांबा नसल्याने त्यांनी वर्धा स्थानक येताच गाडीची गती कमी होताच थेट रेल्वे फलाटावर उड्या मारल्या. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजता घडली.पुनम कापदे (२१) रा. तापडीया नगर व विलास दत्तात्रय गिरी (४२) रा. कोल्हारी, गौरक्षण रोड जि. अकोला अशी जखमीची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील पुरूषाच्या खांद्याला तर युवतीच्या डोक्याला व हाताला जबर इजा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सुत्रानुसार, पुनम कापदे आणि विलास गिरी हे अकोला येथून ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांना वर्धेला यायचे होते. प्रवासादरम्यान या गाडीचा वर्धेत थांबा नसल्याचे समोर आले. सदर गाडी बडनेरा स्थानकावरून रवाना होवून थेट नागपूरला थांबणार होती. यामुळे ते घाबरून गेले होते. त्यांनी वर्धा स्थानकावर गाडीची गती कमी झाल्याने थेट रेल्वे फलाटावर उडी मारली. यावेळी रेल्वे फलाटावर कार्यरत असलेल्या रेल्वे पोलीस शिपाई समाधान गवई, विपीन दातीर यांनी उडी घेताच दोघांनाही रेल्वेच्या दूर ओढले. यामुळे या दोघांचे प्राण वाचले. रेल्वेतून उडी घेताच दोघही बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्याने प्राण बचावले. सध्या या दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारी सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.यापूर्वीही घडले असे प्रकारवर्धा रेल्वे स्थानकावर गाडीची गती कमी होताच फलाटावर उड्या मारण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. नागरिकांनी थांबा नसल्यास दुसºया स्थानकावर उतरल्यास जीवितास होणारा धोका टाळणे शक्य असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.