शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांकरिता महिला रस्त्यावर

By admin | Updated: December 11, 2015 02:32 IST

जिल्ह्यात दारूबंदीमुळे अनेक समस्या बळावत आहेत. यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी.

जमिनीच्या पट्ट्यांसह दारू हद्दपारीकडे वेधले प्रशासनाचे लक्षवर्धा : जिल्ह्यात दारूबंदीमुळे अनेक समस्या बळावत आहेत. यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच अतिक्रमण करून राहणाऱ्यांना घराचे पट्टे देण्यात यावे, स्वत धान्य दुकानात तुरीची डाळ उपलब्ध करून द्यावी यासह अन्य मागण्यांना घेवून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी महिलांच्या एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तत्पूवी मोर्चा जिल्हाकचेरीकडे जात असताना महिलांना जिल्हा न्यायालयाच्या आवाराजवळ अडविण्यात आले. यावेळी मोर्चात सहभागी मुंबई येथून आलेल्या मरियम ढवळे, संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रभाताई घंगारे, जिल्हाध्यक्ष निर्मला वाघ यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी त्यांच्या हक्काकरिता एकत्र येत संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली. यात कुणाचा विरोध झाल्यास त्याला धडा शिकविण्याबाबत मार्गदर्शन केले. जनवादी महिला संघटनेचा हा मोर्चा मालगुजारी पूरा येथील संघटनेच्या कार्यालयातून निघाला. सदर मोर्चा बाजार परिसरातून जिल्हा कचेरीवर पोहोचला. यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी जिल्ह्यात असफल ठरत असलेल्या दारूबंदी विरोधात नारे देत परिसर दणाणून सोडला. जिल्ह्यात दारूबंदी करण्याकरिता विविध गावात दारूबंदी महिला मंडळांची निर्मिती करण्यात आली असून त्यांना त्या भागातील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यासह अन्न सुरक्षा योजनेत खऱ्या गरजवंतांची नावे समाविष्ट करून नवीन शधिापत्रिकांचे वितरण करणे, अतिक्रमण करून घरे बांधून राहत असलेल्यांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात यावे, प्रकल्पग्रस्त महिला शेतकऱ्यांना वीज, पाणी रस्ते आदि सुविधा देण्यात याव्या, वाढत्या महागाईवर आळा बसविण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या मोर्चात जिल्ह्यातील विविध भागातील दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांसह जनवादी महिला मंडळो सदस्य सहभागी होते.(प्रतिनिधी) सर्व मंदिरात महिलांना असलेली प्रवेशबंदी हटवावीमहाराष्ट्रातील अनेक मोठी लहान मंदिरे उदा. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, आदी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी आहे. शनिशिंगणापूर येथे एका महिलेने गाभाऱ्यांत जावून दर्शन घेतले म्हणून तेथील पुजाऱ्यांनी मूर्ती दुधाने धुवून काढली. हा महिलांचा अपमान असून ही बंदी हटविण्यात यावी, अशी मागणी या निवदेनातून करण्यात आली आहे.