शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पाणी प्रश्नावरून महिला आक्रमक

By admin | Updated: March 25, 2017 01:12 IST

नेताजी वॉर्डातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.

नेताजी वॉर्डातील पाणी समस्येवर युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा आर्वी : नेताजी वॉर्डातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे वॉर्डातील महिलांनी थेट न.प. कार्यालय गाठले. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी निवेदन सादर केले. पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांचासोबत चर्चा करुन सोमवारपर्यंत नेताजी वॉर्डातील पाणी समस्या निकाली काढण्याची मागणी केली. यावर लवकर तोडगा काढु, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यावर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले. पालिका प्रशासन कोणत्या उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी २२ मार्च ला युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात नेताजी वॉर्डातील शेकडो महिल व पुरुष तसेच स्वाभिमानी सैनिकांनी न.प. कार्यालयात ठिय्या दिला होता. त्यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी जीवन प्राधिकरणचे खासबागे यांना बोलावून तोडगा काढु असे आश्वासन दिले होते. त्यानुसार २३ मार्च ला मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सभेत असल्याचे सांगितले. दरम्यान गुरूवारी दुपारी ३.३० वाजता नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे हे नेताजी वॉर्डात पोहचले. नागरिकांनी त्यांच्याकडे पाण्याची समस्या मांडली. मात्र नागरिकांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर येथील संतप्त महिलांनी युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्त्वात पालिका कार्यालय गाठले. निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी शुभांगी कलोडे, प्रमिला हत्तीमारे, पुंडलीक भुरके, आशा भुरके, न्यामत भाई, शकुंतला अळसपूरे, यशोदा चोपडे, बेबी हिवरे, ज्योती भुरके, ज्योती हत्तीमारे आदींची उपस्थिती होती.(तालुका/शहर प्रतिनिधी)