शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पाणी प्रश्नावरून महिला आक्रमक

By admin | Updated: March 25, 2017 01:12 IST

नेताजी वॉर्डातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.

नेताजी वॉर्डातील पाणी समस्येवर युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा आर्वी : नेताजी वॉर्डातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे वॉर्डातील महिलांनी थेट न.प. कार्यालय गाठले. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी निवेदन सादर केले. पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांचासोबत चर्चा करुन सोमवारपर्यंत नेताजी वॉर्डातील पाणी समस्या निकाली काढण्याची मागणी केली. यावर लवकर तोडगा काढु, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यावर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले. पालिका प्रशासन कोणत्या उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी २२ मार्च ला युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात नेताजी वॉर्डातील शेकडो महिल व पुरुष तसेच स्वाभिमानी सैनिकांनी न.प. कार्यालयात ठिय्या दिला होता. त्यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी जीवन प्राधिकरणचे खासबागे यांना बोलावून तोडगा काढु असे आश्वासन दिले होते. त्यानुसार २३ मार्च ला मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सभेत असल्याचे सांगितले. दरम्यान गुरूवारी दुपारी ३.३० वाजता नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे हे नेताजी वॉर्डात पोहचले. नागरिकांनी त्यांच्याकडे पाण्याची समस्या मांडली. मात्र नागरिकांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर येथील संतप्त महिलांनी युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्त्वात पालिका कार्यालय गाठले. निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी शुभांगी कलोडे, प्रमिला हत्तीमारे, पुंडलीक भुरके, आशा भुरके, न्यामत भाई, शकुंतला अळसपूरे, यशोदा चोपडे, बेबी हिवरे, ज्योती भुरके, ज्योती हत्तीमारे आदींची उपस्थिती होती.(तालुका/शहर प्रतिनिधी)