शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

गावातील विकासाच्या मुद्यावर आर्वीतील महिला आक्रमक

By admin | Updated: September 11, 2016 00:42 IST

ग्रामपंचायतीच्या ढासळलेला कारभाराविरूद्ध ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली.

गावात समस्यांचा डोंगर : सभेत अधिकाऱ्यांना धरले धारेवरगिरड : ग्रामपंचायतीच्या ढासळलेला कारभाराविरूद्ध ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. गावाच्या विकासाच्या मुद्यावर सभेत उपस्थित अधिकाऱ्यांना महिलांनी चांगलेच धारेवर धरले. यामुळे सभेत तणावही निर्माण झाला होता. अखेर समस्या नोंदवून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला.फरीदपूर गट ग्रा.पं. मधील आर्वी गावात ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमाची कृती आराखडा बैठक घेण्यात आली. ही बैठक वादग्रस्त ठरली. महिलांनी अधिकारी व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना गावाच्या विकासावर चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष समस्या दाखविल्या. दरम्यान, काही युवकांचा शाब्दिक तोल गेल्याने वातावरण तापले होते. परिणामी, अधिकाऱ्यांनी नमते घेत नागरिकांनी सुचविलेली कामे विकास आराखड्यात नमूद करीत काढता पाय घेतला. आर्वी गावात आदिवासी बांधावांची वस्ती असली तरी विकासाबाबत गावाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. गावात प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील आदिवासी बांधवांना समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रा.पं. कडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा रोष महिलांनी सभेत व्यक्त केला. गावात पाणी पुरवठा योजना असून ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सदोष असल्याने नळाला दूषित पाणी येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गावातील एक रस्ता वगळता पूर्ण रस्ते मजबुतीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. एका वॉर्डातील नालीचे बांधकाम झाले; पण उर्वरित संपूर्ण गावातील सांडपाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. पिण्याच्या पाण्याची विहीर असून त्यात नालीतील गढूळ पाणी पाझरते. यामुळे विहिरीतील पाणी दूषित होत आहे. याकडे ग्रा.पं. दुर्लक्ष करीत असल्याने असंतोष पसरला आहे. मुख्य रस्त्यांनी विद्युत खांब आहे; पण पथदिवे लावले नाही. यामुळे रस्त्याने ये-जा करणे जिकरीचे आहे. फरीदपूर व आर्वी गावाच्या विकासासाठी कृती आराखडा सरपंच संजय राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक अल्का वानखेडे, आरोग्य विस्तार अधिकारी वानखेडे, कृषी सहायक शेख, आरोग्य सेवक पी.टी. अंबादे, ग्रामसेवक तेलरांधे, ग्रा.पं. सदस्य अनिल गुडधे उपस्थित होते. आमचा गाव आमचा विकास कृती आराखड्यात नळयोजनेच्या विहिरीचे खोलीकरण, गावातील रस्त्यांची निर्मिती, नाल्याचे बांधकाम आदी कामांना मान्यता देण्यात आली. सभेला उपस्थितांचे आभार ग्रामसेवक तेलरांधे यांनी मानले.(वार्ताहर)