शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गावातील विकासाच्या मुद्यावर आर्वीतील महिला आक्रमक

By admin | Updated: September 11, 2016 00:42 IST

ग्रामपंचायतीच्या ढासळलेला कारभाराविरूद्ध ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली.

गावात समस्यांचा डोंगर : सभेत अधिकाऱ्यांना धरले धारेवरगिरड : ग्रामपंचायतीच्या ढासळलेला कारभाराविरूद्ध ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. गावाच्या विकासाच्या मुद्यावर सभेत उपस्थित अधिकाऱ्यांना महिलांनी चांगलेच धारेवर धरले. यामुळे सभेत तणावही निर्माण झाला होता. अखेर समस्या नोंदवून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला.फरीदपूर गट ग्रा.पं. मधील आर्वी गावात ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमाची कृती आराखडा बैठक घेण्यात आली. ही बैठक वादग्रस्त ठरली. महिलांनी अधिकारी व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना गावाच्या विकासावर चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष समस्या दाखविल्या. दरम्यान, काही युवकांचा शाब्दिक तोल गेल्याने वातावरण तापले होते. परिणामी, अधिकाऱ्यांनी नमते घेत नागरिकांनी सुचविलेली कामे विकास आराखड्यात नमूद करीत काढता पाय घेतला. आर्वी गावात आदिवासी बांधावांची वस्ती असली तरी विकासाबाबत गावाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. गावात प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील आदिवासी बांधवांना समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रा.पं. कडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा रोष महिलांनी सभेत व्यक्त केला. गावात पाणी पुरवठा योजना असून ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सदोष असल्याने नळाला दूषित पाणी येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गावातील एक रस्ता वगळता पूर्ण रस्ते मजबुतीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. एका वॉर्डातील नालीचे बांधकाम झाले; पण उर्वरित संपूर्ण गावातील सांडपाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. पिण्याच्या पाण्याची विहीर असून त्यात नालीतील गढूळ पाणी पाझरते. यामुळे विहिरीतील पाणी दूषित होत आहे. याकडे ग्रा.पं. दुर्लक्ष करीत असल्याने असंतोष पसरला आहे. मुख्य रस्त्यांनी विद्युत खांब आहे; पण पथदिवे लावले नाही. यामुळे रस्त्याने ये-जा करणे जिकरीचे आहे. फरीदपूर व आर्वी गावाच्या विकासासाठी कृती आराखडा सरपंच संजय राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक अल्का वानखेडे, आरोग्य विस्तार अधिकारी वानखेडे, कृषी सहायक शेख, आरोग्य सेवक पी.टी. अंबादे, ग्रामसेवक तेलरांधे, ग्रा.पं. सदस्य अनिल गुडधे उपस्थित होते. आमचा गाव आमचा विकास कृती आराखड्यात नळयोजनेच्या विहिरीचे खोलीकरण, गावातील रस्त्यांची निर्मिती, नाल्याचे बांधकाम आदी कामांना मान्यता देण्यात आली. सभेला उपस्थितांचे आभार ग्रामसेवक तेलरांधे यांनी मानले.(वार्ताहर)