शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणनेची भीती बाळगणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:17 IST

देशात जाती व्यवस्था मजबूत होईल, अशा भावनेतून जातीनिहाय जनगणना होत नाही पण अशी भीती बाळगणे चुकीचे आहे.

ठळक मुद्देरामदास आठवले : हिंगणघाट येथे पत्रकार परिषद, रामदास तडस व समीर कुणावार यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : देशात जाती व्यवस्था मजबूत होईल, अशा भावनेतून जातीनिहाय जनगणना होत नाही पण अशी भीती बाळगणे चुकीचे आहे. जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.ना. आठवले यांनी विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. ते म्हणाले की, दलितांवर देशात होणाºया अत्याचाराला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसने ७० वर्षांच्या काळात कधीही धर्मांतरीत नवबौद्धांना सवलती देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मोदी सरकारने नवबौद्धांना सवलती देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आमच्या पक्षाची व भाजपची विचारसरणी ही वेगवेगळी असली तरी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या आधारावर सत्ता चालवित आहे. सत्तेत राहून सामाजिक व आर्थिक समतोल सांभाळण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकार हे दलितांचे आरक्षण रद्द करणार आहे, अशा अफवा काँग्रेसद्वारे पसरविण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणतेही आरक्षण रद्द करण्यात येणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी यावेळी दिली.देशांतर्गत ७७ टक्के समाज जाती आरक्षणात येत असून उर्वरित २३ टक्के समाज आरक्षणात येत नाही. यामुळे सद्यस्थितीत ५० टक्के असलेली आरक्षण मर्यादा ७५ टक्के वाढवून आरक्षणाची मागणी करणाºया मराठा, मुस्लिमसह इतर सर्व समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा, असे मत मांडून ओबीसींच्या वाट्यातून मराठा आरक्षणाला त्यांनी विरोध दर्शविला. मातंग समाजाची वेगळ्या आरक्षणाची मागणी असली तरी जातीनिहाय वेगळे आरक्षण शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला कायदा करावा लागणार आहे. त्याशिवाय या समाजाला आरक्षण मिळणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.नांदेड महानगर पालिकेमध्ये झालेला काँग्रेसचा विजय हा त्या पक्षाचा विजय नसून माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांची पुण्याई तथा अशोक चव्हाण यांचे नांदेडमधील काम व त्यांचे नियोजन ही या विजयाची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला खासदार रामदास तडस, आ. समीर कुणावार, भुपेश थूलकर, आर.एस. वानखेडे, जि.प. सदस्य व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, अ‍ॅड. केशवराव धाबर्डे, शंकर मुंजेवार, सत्यपाल मांडवे, प्रकाश कांबळे, दौलत मून व असंख्य रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.आमदारांतर्फे केंद्रीय राज्यमंत्र्यांचा सत्कारहिंगणघाट - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी रविवारी सायंकाळी ६ वाजता येथील आ. समीर कुणावार यांच्या निवासस्थानी भेट दिली असता आ. कुणावार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी खा. रामदास तडस, रिपाइं नेते भुपेश थूलकर, जिल्हाध्यक्ष विजय आगलावे उपस्थित होते.ना. आठवले यांनी खा. तडस, आ. कुणावार यांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यावर या योजनांतर्गत दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त व दिव्यांगांच्या मदतीसाठी विकास निधीची मागणी आ. कुणावार यांनी केली. ना. आठवले यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली. विकास कामांबाबत त्यांनी चर्चाही केली. यावेळी रिपाइंचे शंकर मुंजेवार, सत्यपाल मांडवे, भाजप जिल्हा महामंत्री किशोर दिघे, न.प. उपाध्यक्ष चंदु घुसे, न.प. सभापती अंकुश ठाकूर, न.प. सदस्य छाया सातपुते, चंदू माळवे, निलेश पोगले, भाजप अध्यक्ष आशिष परबत, बिस्मिल्ला खान आदी उपस्थित होते.