शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

‘त्या’ खड्ड्यामुळे अपघाताची भीती

By admin | Updated: June 7, 2017 00:38 IST

स्थानिक बजाज चौकात रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार झाला आहे. परिणामी, वाहन चालकांना नाहक त्रास सहन करत

वाहनचालकांना त्रास : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : स्थानिक बजाज चौकात रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार झाला आहे. परिणामी, वाहन चालकांना नाहक त्रास सहन करत येथून पुढील प्रवास करावा लागत आहे. सदर खड्डा तातडीने बुजविणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मोठ्या अपघाताची भीती बळावत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत खड्डा बुजविण्याची मागणी आहे. बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने छोटा पडत होता. त्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. परंतु, सदर काम कासवगतीनेच होत असल्याची शहरात ओरड आहे. त्यातच बजाज चौकात जीवघेणा खड्डा तयार झाल आहे. त्यामुळे भामटीपुरा चौकाकडून उड्डाणपुलाकडे, रेल्वे स्थानक व बसस्थानकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन पुढील प्रवास करावा लागत आहे. खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक अपघात झाल्याची बरेच उदाहरणे आहेत. अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. बजाज चौकातील त्या खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची भीती बळावत असून याकडे लक्ष देत तात्काळ तो खड्डा बुजविण्याची मागणी आहे. बजाज चौकातील सदर खड्डा रात्रीला सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सुसाट पळविली जातात वाहने शिवाजी चौक ते बजाज चौक दरम्यानच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आल्यापासून हा मार्ग गुळगुळीत झाला आहे. या मार्गाने दिवसाला जड वाहनांना ये-जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले असले तरी दिवसाला मोठ्या प्रमाणात जड वाहने या मार्गाने ये-जा करताना दिसतात. बहुदा दुचाकीचालकासह जड वाहनचालक आपल्या ताब्यातील वाहने सुसाट पळवितात. त्यातच बजाज चौकातील तो खड्डा रात्रीच्या सुमारास सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. शिवाजी चौक ते बजाज चौक दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक लावणे गरजेचे आहे.