शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उपोषण

By admin | Updated: May 25, 2017 01:02 IST

जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना २०१५-१६ या वर्षातील शिष्यवृत्ती मिळालेली नाही.

उपोषणाचा दुसरा दिवस : शिक्षण हक्क परिषदेचे साखळी उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना २०१५-१६ या वर्षातील शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याकडे जिल्हा परिषद प्रशासन व आदिवासी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी एससी, एसटी शिक्षण हक्क परिषदेच्या नेतृत्वात मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व मूलभूत सोईसुविधांसाठी अडचणी येऊ नये, यासाठी राज्य शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. मात्र, २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आदिवासी विकास विभागातर्फे हा निधी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. मात्र आदिवासी विभागाकडून विद्यार्थ्यांची यादी न मिळाल्याने शिष्यवृत्ती वाटपात अडचण येत आहेत, अशी माहिती पुढे आली. जिल्हा परिषदेने याबाबत कार्यवाही का केली नाही, असा प्रश्न शिक्षण हक्क परिषदेचे मारोती उईके यांनी केला. बंद पडलेल्या शासकीय आश्रम शाळा तालुका व जिल्हास्थळी पूर्ववत सुरू करा, वर्ध्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून सर्व विकासयोजना कार्यान्वित करा, विद्यार्थ्यांसाठी फिरते वाचनालय सुरू करा, स्पर्धा परिक्षेसाठी जिल्हास्थळी मार्गदर्शन केंद्र उभारावे, जात पडताळणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे, नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या शाळा संस्थांकडून काढून शासनाच्या अखत्यारीत कराव्या, आदिवासी विकास योजनांचे अर्ज वर्धा कार्यालयातूनच मंजूर करावे, समुद्रपूरात विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळ, शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा, यासाठी प्रकल्पस्तरीय व जिल्हास्तरीय देखरेख समिती स्थापन करावी. या समित्यांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यास सदस्य म्हणून नियुक्त करावे, आदि मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना देण्यात आले. या उपोषणात मारोती उईके, रवींद्र उईके, डॉ. ज्योती लुंगे, शंकर सराटे, सावित्री भगत, पद्माकर कांबळे, उदाराम कन्नाके, बेबी जगताप, चंद्रशेखर मडावी, राकेश धुर्वे आदी कार्यकर्ते सहभागी आहेत.शिष्यवृत्तीचे २ कोटी थकीतशिष्यवृत्तीपोटी जिल्हा परिषदकडे २ कोटी रूपये ५९ लाख ७ हजार ५०० रूपये पडून आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळत नसल्याने मंगळवारपासून सुरू केले उपोषण शुक्रवारपर्यंत कायम राहणार आहे. यात संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.