शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उपोषण

By admin | Updated: May 25, 2017 01:02 IST

जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना २०१५-१६ या वर्षातील शिष्यवृत्ती मिळालेली नाही.

उपोषणाचा दुसरा दिवस : शिक्षण हक्क परिषदेचे साखळी उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना २०१५-१६ या वर्षातील शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याकडे जिल्हा परिषद प्रशासन व आदिवासी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी एससी, एसटी शिक्षण हक्क परिषदेच्या नेतृत्वात मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व मूलभूत सोईसुविधांसाठी अडचणी येऊ नये, यासाठी राज्य शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. मात्र, २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आदिवासी विकास विभागातर्फे हा निधी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. मात्र आदिवासी विभागाकडून विद्यार्थ्यांची यादी न मिळाल्याने शिष्यवृत्ती वाटपात अडचण येत आहेत, अशी माहिती पुढे आली. जिल्हा परिषदेने याबाबत कार्यवाही का केली नाही, असा प्रश्न शिक्षण हक्क परिषदेचे मारोती उईके यांनी केला. बंद पडलेल्या शासकीय आश्रम शाळा तालुका व जिल्हास्थळी पूर्ववत सुरू करा, वर्ध्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून सर्व विकासयोजना कार्यान्वित करा, विद्यार्थ्यांसाठी फिरते वाचनालय सुरू करा, स्पर्धा परिक्षेसाठी जिल्हास्थळी मार्गदर्शन केंद्र उभारावे, जात पडताळणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे, नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या शाळा संस्थांकडून काढून शासनाच्या अखत्यारीत कराव्या, आदिवासी विकास योजनांचे अर्ज वर्धा कार्यालयातूनच मंजूर करावे, समुद्रपूरात विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळ, शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा, यासाठी प्रकल्पस्तरीय व जिल्हास्तरीय देखरेख समिती स्थापन करावी. या समित्यांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यास सदस्य म्हणून नियुक्त करावे, आदि मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना देण्यात आले. या उपोषणात मारोती उईके, रवींद्र उईके, डॉ. ज्योती लुंगे, शंकर सराटे, सावित्री भगत, पद्माकर कांबळे, उदाराम कन्नाके, बेबी जगताप, चंद्रशेखर मडावी, राकेश धुर्वे आदी कार्यकर्ते सहभागी आहेत.शिष्यवृत्तीचे २ कोटी थकीतशिष्यवृत्तीपोटी जिल्हा परिषदकडे २ कोटी रूपये ५९ लाख ७ हजार ५०० रूपये पडून आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळत नसल्याने मंगळवारपासून सुरू केले उपोषण शुक्रवारपर्यंत कायम राहणार आहे. यात संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.