शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उपोषण

By admin | Updated: May 25, 2017 01:02 IST

जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना २०१५-१६ या वर्षातील शिष्यवृत्ती मिळालेली नाही.

उपोषणाचा दुसरा दिवस : शिक्षण हक्क परिषदेचे साखळी उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना २०१५-१६ या वर्षातील शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याकडे जिल्हा परिषद प्रशासन व आदिवासी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी एससी, एसटी शिक्षण हक्क परिषदेच्या नेतृत्वात मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व मूलभूत सोईसुविधांसाठी अडचणी येऊ नये, यासाठी राज्य शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. मात्र, २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आदिवासी विकास विभागातर्फे हा निधी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. मात्र आदिवासी विभागाकडून विद्यार्थ्यांची यादी न मिळाल्याने शिष्यवृत्ती वाटपात अडचण येत आहेत, अशी माहिती पुढे आली. जिल्हा परिषदेने याबाबत कार्यवाही का केली नाही, असा प्रश्न शिक्षण हक्क परिषदेचे मारोती उईके यांनी केला. बंद पडलेल्या शासकीय आश्रम शाळा तालुका व जिल्हास्थळी पूर्ववत सुरू करा, वर्ध्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून सर्व विकासयोजना कार्यान्वित करा, विद्यार्थ्यांसाठी फिरते वाचनालय सुरू करा, स्पर्धा परिक्षेसाठी जिल्हास्थळी मार्गदर्शन केंद्र उभारावे, जात पडताळणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे, नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या शाळा संस्थांकडून काढून शासनाच्या अखत्यारीत कराव्या, आदिवासी विकास योजनांचे अर्ज वर्धा कार्यालयातूनच मंजूर करावे, समुद्रपूरात विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळ, शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा, यासाठी प्रकल्पस्तरीय व जिल्हास्तरीय देखरेख समिती स्थापन करावी. या समित्यांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यास सदस्य म्हणून नियुक्त करावे, आदि मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना देण्यात आले. या उपोषणात मारोती उईके, रवींद्र उईके, डॉ. ज्योती लुंगे, शंकर सराटे, सावित्री भगत, पद्माकर कांबळे, उदाराम कन्नाके, बेबी जगताप, चंद्रशेखर मडावी, राकेश धुर्वे आदी कार्यकर्ते सहभागी आहेत.शिष्यवृत्तीचे २ कोटी थकीतशिष्यवृत्तीपोटी जिल्हा परिषदकडे २ कोटी रूपये ५९ लाख ७ हजार ५०० रूपये पडून आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळत नसल्याने मंगळवारपासून सुरू केले उपोषण शुक्रवारपर्यंत कायम राहणार आहे. यात संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.