शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

कापसाच्या दरातील मंदीने शेतकरी चिंतेत

By admin | Updated: October 8, 2014 23:30 IST

खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांतून थोडे थोडके उत्पन्न हाती येण्याची वेळ आली.

घोराड : खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांतून थोडे थोडके उत्पन्न हाती येण्याची वेळ आली. अशात व्यापाऱ्यांकडून दर वर्षी होणारी लूट कायम राहणार वा यंदाही हमी भावावरच समाधान मानावे लागणार अशी चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडली आहे.विजय दशमीला दरवर्षी होणारा कापूस खरेदीचा शुभारंभ यावर्षी टळला. हा शुभारंभ उशिरा होणाऱ्या कापूस वेचणीमुळे लांबला असला तरी शासनाच्या हमीभावावर व्यापारी जास्त रक्कम देवून कापूस खरेदी करेल अथवा शेतकऱ्यांच्या हाती हमीभावच येणार अशी चिंता त्याला पडली आहे. शासनाचा हमीभाव ४ हजार ५० रुपये आहे. या भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडणारा नाही. सुर्याेदय अन् सूर्यास्त शेताच्या बांधावर पाहणाऱ्या शेतकऱ्यांना महागडी बियाणे व शेणखतासह रासायनिक खताचा खर्च त्यातच निंदणाचा वाढलेला खर्च, कापूस वेचणी आदी खर्चाचे बजेट पाहता व खरीपाच्या सुरुवातीला पावसाने मारलेल्या दडीमुळे विलंबाने झालेल्या पेरण्या उत्पन्नात घट आणीत आहे. यामुळे उत्पादन खर्चावर कापसाला भाव मिळाला नाही तर सलग चौथ्या वर्षीही कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल होणार असल्याचे चिन्ह आहे. कापसाला सहा हजारांपेक्षा अधिक भाव यावर्षी मिळाला नाही तर खरीप हंगामातील पांढऱ्या सोन्यापासून शेतकरी दुरावला जाण्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. शासनाच्या हमी भावापेक्षा कमी भाव कापूस उत्पादकांना मिळू नये याकरिता शासकीय कापूस खरेदी केंद्र तालुका स्थळावर दिवाळीपुर्वी सुरू करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)