शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

कापसाच्या दरातील मंदीने शेतकरी चिंतेत

By admin | Updated: October 8, 2014 23:30 IST

खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांतून थोडे थोडके उत्पन्न हाती येण्याची वेळ आली.

घोराड : खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांतून थोडे थोडके उत्पन्न हाती येण्याची वेळ आली. अशात व्यापाऱ्यांकडून दर वर्षी होणारी लूट कायम राहणार वा यंदाही हमी भावावरच समाधान मानावे लागणार अशी चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडली आहे.विजय दशमीला दरवर्षी होणारा कापूस खरेदीचा शुभारंभ यावर्षी टळला. हा शुभारंभ उशिरा होणाऱ्या कापूस वेचणीमुळे लांबला असला तरी शासनाच्या हमीभावावर व्यापारी जास्त रक्कम देवून कापूस खरेदी करेल अथवा शेतकऱ्यांच्या हाती हमीभावच येणार अशी चिंता त्याला पडली आहे. शासनाचा हमीभाव ४ हजार ५० रुपये आहे. या भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडणारा नाही. सुर्याेदय अन् सूर्यास्त शेताच्या बांधावर पाहणाऱ्या शेतकऱ्यांना महागडी बियाणे व शेणखतासह रासायनिक खताचा खर्च त्यातच निंदणाचा वाढलेला खर्च, कापूस वेचणी आदी खर्चाचे बजेट पाहता व खरीपाच्या सुरुवातीला पावसाने मारलेल्या दडीमुळे विलंबाने झालेल्या पेरण्या उत्पन्नात घट आणीत आहे. यामुळे उत्पादन खर्चावर कापसाला भाव मिळाला नाही तर सलग चौथ्या वर्षीही कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल होणार असल्याचे चिन्ह आहे. कापसाला सहा हजारांपेक्षा अधिक भाव यावर्षी मिळाला नाही तर खरीप हंगामातील पांढऱ्या सोन्यापासून शेतकरी दुरावला जाण्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. शासनाच्या हमी भावापेक्षा कमी भाव कापूस उत्पादकांना मिळू नये याकरिता शासकीय कापूस खरेदी केंद्र तालुका स्थळावर दिवाळीपुर्वी सुरू करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)