शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या दरातील मंदीने शेतकरी चिंतेत

By admin | Updated: October 8, 2014 23:30 IST

खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांतून थोडे थोडके उत्पन्न हाती येण्याची वेळ आली.

घोराड : खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांतून थोडे थोडके उत्पन्न हाती येण्याची वेळ आली. अशात व्यापाऱ्यांकडून दर वर्षी होणारी लूट कायम राहणार वा यंदाही हमी भावावरच समाधान मानावे लागणार अशी चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडली आहे.विजय दशमीला दरवर्षी होणारा कापूस खरेदीचा शुभारंभ यावर्षी टळला. हा शुभारंभ उशिरा होणाऱ्या कापूस वेचणीमुळे लांबला असला तरी शासनाच्या हमीभावावर व्यापारी जास्त रक्कम देवून कापूस खरेदी करेल अथवा शेतकऱ्यांच्या हाती हमीभावच येणार अशी चिंता त्याला पडली आहे. शासनाचा हमीभाव ४ हजार ५० रुपये आहे. या भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडणारा नाही. सुर्याेदय अन् सूर्यास्त शेताच्या बांधावर पाहणाऱ्या शेतकऱ्यांना महागडी बियाणे व शेणखतासह रासायनिक खताचा खर्च त्यातच निंदणाचा वाढलेला खर्च, कापूस वेचणी आदी खर्चाचे बजेट पाहता व खरीपाच्या सुरुवातीला पावसाने मारलेल्या दडीमुळे विलंबाने झालेल्या पेरण्या उत्पन्नात घट आणीत आहे. यामुळे उत्पादन खर्चावर कापसाला भाव मिळाला नाही तर सलग चौथ्या वर्षीही कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल होणार असल्याचे चिन्ह आहे. कापसाला सहा हजारांपेक्षा अधिक भाव यावर्षी मिळाला नाही तर खरीप हंगामातील पांढऱ्या सोन्यापासून शेतकरी दुरावला जाण्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. शासनाच्या हमी भावापेक्षा कमी भाव कापूस उत्पादकांना मिळू नये याकरिता शासकीय कापूस खरेदी केंद्र तालुका स्थळावर दिवाळीपुर्वी सुरू करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)