शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देगत वर्षी दिली होती केवळ २८.३८ टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी पीक विमा एच्छिक असला तरी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. खरीप हंगाम सुरू झाल्यावर सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत लेखी तक्रार विमा कंपनी व कृषी विभागाला केली. सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील वर्षी ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी केवळ २८.३८ टक्केच शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली होती. त्यामुळे विमा कंपनी मनमना करीत असल्याचे दिसते.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केल्या लेखी तक्रारीयंदाच्या वर्षी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीकविमा काढणाऱ्यांपैकी तब्बल ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनी तसेच कृषी विभागाला तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी सादर करून किमान अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी एकाही शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत विमा कंपनीकडून देण्यात आलेली नाही.मागील वर्षी दिली ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना भरपाईमागील वर्षी तब्बल ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे कवच घेतले होते. पण विमा कंपनीने ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवित त्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली होती. विमा काढणाऱ्यांच्या तुलनेत हा टक्का २८.३८ होता.

टॅग्स :agricultureशेती