शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कृषी साहित्य चोरीने शेतकरी धास्तावले

By admin | Updated: November 23, 2015 01:50 IST

रबी हंगाम सुरू होऊन जिल्ह्यात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गारठा पडायलाही सुरुवात झाली आहे.

नुकसान भरपाईची मागणी : ऐन रबी हंगामात चोरीचे सत्र सुरूवर्धा : रबी हंगाम सुरू होऊन जिल्ह्यात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गारठा पडायलाही सुरुवात झाली आहे. अनेक भागात गहू, चना आदी पिकांच्या पेरण्या आटोपून ओलित करणेही सुरू झाले आहे. पण गारठ्याचा फायदा घेत शेतशिवारांमधून कृषिपंप, स्प्रिंल्करचे पितळी नोझल, डिपींमधील तांब्याच्या पट्ट्या, तेल आदी साहित्य चोरीचा सपाटा चोरट्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे आधीच खरीपाने मोडकळीस आलेले शेतकरी या चोरींनी धास्तावले आहेत. शासनाने अश्या चोरींची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली जात आहे. रबी हंगाम हा पूर्णपणे सिंचनावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रकल्पातून सिंचनाची सोय असलेले शेतकरी तसेच विहीर व नदी, नाले जवळ असलेले शेतकरी रबीची पेरणी करीत असतात. सध्या चणा, गहू यासह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. पिकांच्या वाढीसाठी पाणी देण्यासाठी सर्वाधिक आवश्यकता असते ती कृषिपंपाची. त्यामुळे खर्च करून शेतकरी कृषिपंप बसवितात. यासाठी २० ते २५ हजारांचा खर्च येतो. अनेक शेतकरी या काही वर्षात स्प्रिंक्लर व ड्रिपरच्या सहाय्यानेही ओलित करीत आहेत. शेतकरी वर्गाला वीजवितरणचे भारनियमनचे वेळापत्रक पाहून पिकांना ओलित करावे लागते. सध्या केवळ लागवड झाली असल्याने रात्रीला सिंचन करण्याचे प्रमाण जरा कमी आहे. नेमका याचाच फायदा घेत वर्धा. देवळी, हिंगणघाट परिसरात शेतीसाहित्याची चोरी करणारे चोर सक्रीय झाले आहेत. शेतीपंप खोलून त्यातील तांब्याची तार व इतरही साहित्य चोरले जाते. तसेच स्प्रिंक्लर पाईपमधील पितळी नोझल चोरून नेले जातात. हा प्रकार या काही दिवसात वाढल्याने शेतकरी धास्तावले असून सिंचन कसे करावे हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवतात. परंतु चोरटे किती पोलिसांच्या हाती लागतात का हा प्रश्नच आहे. त्यामुळे अश्या चोऱ्या होऊ नये यासाठी ग्रामीण शेतशिवारांमध्ये पेट्रिलिंग व्हावी व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)