शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी साहित्य चोरीने शेतकरी धास्तावले

By admin | Updated: November 23, 2015 01:50 IST

रबी हंगाम सुरू होऊन जिल्ह्यात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गारठा पडायलाही सुरुवात झाली आहे.

नुकसान भरपाईची मागणी : ऐन रबी हंगामात चोरीचे सत्र सुरूवर्धा : रबी हंगाम सुरू होऊन जिल्ह्यात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गारठा पडायलाही सुरुवात झाली आहे. अनेक भागात गहू, चना आदी पिकांच्या पेरण्या आटोपून ओलित करणेही सुरू झाले आहे. पण गारठ्याचा फायदा घेत शेतशिवारांमधून कृषिपंप, स्प्रिंल्करचे पितळी नोझल, डिपींमधील तांब्याच्या पट्ट्या, तेल आदी साहित्य चोरीचा सपाटा चोरट्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे आधीच खरीपाने मोडकळीस आलेले शेतकरी या चोरींनी धास्तावले आहेत. शासनाने अश्या चोरींची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली जात आहे. रबी हंगाम हा पूर्णपणे सिंचनावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रकल्पातून सिंचनाची सोय असलेले शेतकरी तसेच विहीर व नदी, नाले जवळ असलेले शेतकरी रबीची पेरणी करीत असतात. सध्या चणा, गहू यासह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. पिकांच्या वाढीसाठी पाणी देण्यासाठी सर्वाधिक आवश्यकता असते ती कृषिपंपाची. त्यामुळे खर्च करून शेतकरी कृषिपंप बसवितात. यासाठी २० ते २५ हजारांचा खर्च येतो. अनेक शेतकरी या काही वर्षात स्प्रिंक्लर व ड्रिपरच्या सहाय्यानेही ओलित करीत आहेत. शेतकरी वर्गाला वीजवितरणचे भारनियमनचे वेळापत्रक पाहून पिकांना ओलित करावे लागते. सध्या केवळ लागवड झाली असल्याने रात्रीला सिंचन करण्याचे प्रमाण जरा कमी आहे. नेमका याचाच फायदा घेत वर्धा. देवळी, हिंगणघाट परिसरात शेतीसाहित्याची चोरी करणारे चोर सक्रीय झाले आहेत. शेतीपंप खोलून त्यातील तांब्याची तार व इतरही साहित्य चोरले जाते. तसेच स्प्रिंक्लर पाईपमधील पितळी नोझल चोरून नेले जातात. हा प्रकार या काही दिवसात वाढल्याने शेतकरी धास्तावले असून सिंचन कसे करावे हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवतात. परंतु चोरटे किती पोलिसांच्या हाती लागतात का हा प्रश्नच आहे. त्यामुळे अश्या चोऱ्या होऊ नये यासाठी ग्रामीण शेतशिवारांमध्ये पेट्रिलिंग व्हावी व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)