शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

कृषी साहित्य चोरीने शेतकरी धास्तावले

By admin | Updated: November 23, 2015 01:50 IST

रबी हंगाम सुरू होऊन जिल्ह्यात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गारठा पडायलाही सुरुवात झाली आहे.

नुकसान भरपाईची मागणी : ऐन रबी हंगामात चोरीचे सत्र सुरूवर्धा : रबी हंगाम सुरू होऊन जिल्ह्यात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गारठा पडायलाही सुरुवात झाली आहे. अनेक भागात गहू, चना आदी पिकांच्या पेरण्या आटोपून ओलित करणेही सुरू झाले आहे. पण गारठ्याचा फायदा घेत शेतशिवारांमधून कृषिपंप, स्प्रिंल्करचे पितळी नोझल, डिपींमधील तांब्याच्या पट्ट्या, तेल आदी साहित्य चोरीचा सपाटा चोरट्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे आधीच खरीपाने मोडकळीस आलेले शेतकरी या चोरींनी धास्तावले आहेत. शासनाने अश्या चोरींची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली जात आहे. रबी हंगाम हा पूर्णपणे सिंचनावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रकल्पातून सिंचनाची सोय असलेले शेतकरी तसेच विहीर व नदी, नाले जवळ असलेले शेतकरी रबीची पेरणी करीत असतात. सध्या चणा, गहू यासह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. पिकांच्या वाढीसाठी पाणी देण्यासाठी सर्वाधिक आवश्यकता असते ती कृषिपंपाची. त्यामुळे खर्च करून शेतकरी कृषिपंप बसवितात. यासाठी २० ते २५ हजारांचा खर्च येतो. अनेक शेतकरी या काही वर्षात स्प्रिंक्लर व ड्रिपरच्या सहाय्यानेही ओलित करीत आहेत. शेतकरी वर्गाला वीजवितरणचे भारनियमनचे वेळापत्रक पाहून पिकांना ओलित करावे लागते. सध्या केवळ लागवड झाली असल्याने रात्रीला सिंचन करण्याचे प्रमाण जरा कमी आहे. नेमका याचाच फायदा घेत वर्धा. देवळी, हिंगणघाट परिसरात शेतीसाहित्याची चोरी करणारे चोर सक्रीय झाले आहेत. शेतीपंप खोलून त्यातील तांब्याची तार व इतरही साहित्य चोरले जाते. तसेच स्प्रिंक्लर पाईपमधील पितळी नोझल चोरून नेले जातात. हा प्रकार या काही दिवसात वाढल्याने शेतकरी धास्तावले असून सिंचन कसे करावे हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवतात. परंतु चोरटे किती पोलिसांच्या हाती लागतात का हा प्रश्नच आहे. त्यामुळे अश्या चोऱ्या होऊ नये यासाठी ग्रामीण शेतशिवारांमध्ये पेट्रिलिंग व्हावी व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)